



बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील युवक महोत्सव - तरुणाई २०२५ थाटात संपन्न झाला.
महाविद्यालय दरवर्षी युवक महोत्सव साजरा होतो. यावर्षी देखील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने दिनांक १९,२०,२१ फेब्रुवारीला युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाच्या दोन दिवसा अगोदर १७ व १८ क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये मुला-मुलींकरिता क्रिकेट, हॉलीबॉल, लिंबू चमचा, रस्सीखेच अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसह, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तरुणाई २०२५ स्नेहसंमेलना च्या उद्घाटन समारंभाला उद्घाटक म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यास चे अध्यक्ष मा. विनायकजी दाते उपस्थित होते. त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात- बक्षीस मिळवण्यासाठीच नव्हे तर खेळीमेळीच्या वातावरणात जीवन जगण्याची कला आपल्याला आत्मसात करता येईल का? याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु उपस्थित होते. व प्रमुख पाहुणे म्हणून खास अमेरिकेवरून आलेल्या मीराताई बावडेकर उपस्थित होत्या.
दिनांक १९,२०,२१ फेब्रुवारी युवक महोत्सव तरुणाई २०२५ या या कार्यक्रमाद्वारे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, डिश डेकोरेशन, पुष्परचना, सुगम संगीत, बचाव स्पर्धा, ट्विन्स स्पर्धा, वेशभूषा, कवी संमेलन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व आनंद मेळाव्याचा समावेश करण्यात आला. विविध स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन उत्तमोत्तम कलागुणांचे सादरीकरण केले. सांघिकतेने कार्य करतांना अनेकांशी जुळवून घेऊन कशा रीतीने आपण उत्तम प्रदर्शन करू शकतो याचे प्रत्यय विद्यार्थ्यानी आत्मसात करावा. तरुणाई २०२५ च्या निमित्ताने ओसंडून वाहणारा आनंद साजरा करताना समाजभान जोपासण्याचा सल्ला सुद्धा आपल्या अध्यक्ष भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेश सिंगरू यांनी विद्यार्थ्यांना दिला. उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन म्हणून एक उत्तम पोवाडा सादर केला व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत प्रयागराज येथील कुंभमेळा यावर आधारित महाकाली चे सादरीकरण टाळ्यांच्या कडकडाटासह अग्रेसर ठरला. तरुणाई २०२५ युवक महोत्सवाचे उद्घाटन संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बागडे यांच्या मार्गदर्शनात उद्घाटनाची फीती कापल्यानंतर एका आगळा वेगळ्या पद्धतीने पारंपारिक फोक ऑर्केस्ट्रा द्वारे २० मिनिटांचे सादरीकरण करून स्नेहसंमेलनाची एक भन्नाट सुरुवात केली. विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मीराताई बावडेकर यांनी खास विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना बोलके केले, व फोक ऑर्केस्ट्राचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावर्षीच्या युवक महोत्सव- तरुणाई २०२५ चे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. प्रशांत बागडे तर सह-समन्वयक म्हणून प्रा. अविनाश रामपाल मसराम यांनी समर्थपणे जबाबदारी सांभाळली.
युवक महोत्सवाला विश्वस्त सौ. सुषमा दाते, सौ. मनीषाताई साठे, सौ. मीराताई बावडेकर आणि कु. तेजल बावडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मैत्रीला भाषेचे बंधन नसते याचा प्रत्यय अमेरिकेतील कु. तेजल बावडेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. फावल्या वेळात महाविद्यालयातील अनेक मुलींशी मैत्री करून मंचावर हिंदी फिल्म गीतावर नृत्य सादरीकरणात प्रत्यक्ष सहभाग घेऊन अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. दोन दिवसात केलेल्या सरावाच्या बळावर मनात इच्छा असेल तर भाषा अडथळा ठरत नाही याचे प्रत्यक्ष उदाहरण कुमारी तेजल हिने विद्यार्थ्यांना दाखवून दिले.
युवक महोत्सवासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांच्या मार्गदर्शनात सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन युवक महोत्सव यशस्वी करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले.
रोजगार भरती मेळावा
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यवतमाळ आणि बाबाजी दाते कला आणी वाणिज्य महाविद्यालय उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने आमच्या महाविद्यालयात जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवार रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी वेळ 11 वाजता आयोजित करण्यात आले होते. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील विविध 14 आस्थापनांनी सहभाग नोंदविला. मागील तीन वर्षातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगार संधी मिळण्याकरिता आयोजकांना बोलाविले होते. मेळाव्यात एकूण 119 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्यातील 102 विद्यार्थ्यांची शिकाऊ उमेदवारी आणि रोजगारासाठी निवड करण्यात आली.
मेळाव्याकरिता उपस्थित नागपूरचे विनीत एंटरप्राइजेस चे मयूर उजवणे संभाजीनगर येथील स्काय प्लेसमेंटचे विजय तांदळे राजवी होंडा यवतमाळ येथील कुमारी साक्षी शेरजे हिमालय बजाज यवतमाळचे अमोल गाढवेकर रानडे डेअरी यवतमाळचे आनंद रानडे तसेच मॅक मोटर्स यवतमाळ येथील स्वप्नील सावरकर आणि भारतीय जीवन विमा महामंडळाचे विकास अधिकारी सचिन अवधूत इत्यादी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन 102 विद्यार्थ्यांची शिकाऊ उमेदवारी आणि रोजगारासाठी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाकरिता अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु तर विशेष उपस्थिती म्हणून संस्थेचे अध्यक्ष विनायकराव दाते, विश्वस्त सुषमा दाते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आयआयएल संचालक अजय लाड उद्घाटक म्हणून श्री आर पी कोडापे बीटीआरआय सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार किशोर वाडेकर अधीक्षक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यवतमाळ प्रामुख्याने उपस्थित होते 14 आस्थापनातील व्यवसाय अभ्यासक्रमांतर्गत असणारे शिक्षक यांची आवर्जून उपस्थिती होती महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय त्रिवेदी यांनी तर कार्यक्रमाचे संचालन अविनाश मसराम यांनी केले




दाते महाविद्यालयात NEP स्कूल कनेक्ट २.० संपन्न
बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयामध्ये आय.क्यू.ए.सी. तर्फे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 वर आधारित शासनाच्या स्कूल कनेक्ट २.० प्रोग्राम अंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अजय लाड प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू उपस्थित होते. वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष श्री विनायक दाते तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेली होती. सर्वप्रथम दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत गायनाने झाली. कार्यशाळेच्या प्रास्ताविकामध्ये डॉ. सचिन तेलखडे यांनी कार्यशाळेची आवश्यकता आणि NEP चे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. अजय लाड, इनक्युबेशन सेंटर अमरावती विद्यापीठ चे प्रमुख यांनी आपल्या भाषणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्त्व आणि भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये त्याची आवश्यकता यावर भर दिला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे शिक्षणातील आमुलाग्र बदल आहे, हे पण विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी NEP मध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम या विषयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. NEP मधून आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानाशी कसे अवगत होता येईल, हे पण याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. सचिन तेलखडे यांनी काम पाहिले.
या कार्यशाळेचे संचलन प्रा. नलिनी आडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली. या कार्यक्रमाला बी.ए. व बी.कॉम. भाग ३ तसेच ११ वी व १२ वी चे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
दीक्षारंभ कार्यक्रम
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये सोमवार दि. ०२/०७/२०२४ ते शुक्रवार ०५/०७/२०२४ दरम्यान दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंगळवार ०२ जुलै रोजी सकाळी 11 वाजता दीक्षारंभ कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. सर्वप्रथम मंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. प्रदीप दरवरे यांनी आपल्या प्रस्ताविकातून दीक्षारंभ कार्यक्रमा मागील भूमिका स्पष्ट केली. त्यांनी महाविद्यालयातील विविध उपलब्ध सुविधांबद्दल विस्तृत माहिती दिली तसेच महाविद्यालयातील विविध विभाग तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परिचय करून दिला. प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले अध्यक्ष, वाणिज्य महाविद्यालय न्यास मा.श्री. विनायक दाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. तुषार कोटक S. P. M. गिलानी महाविद्यालय, घाटंजी यांनी विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच करिअर बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर सौ. सुषमाताई दाते उपस्थित होत्या. दीक्षारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जीवनात शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे
पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांना कुठल्याही अडचणी आल्यास त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. डॉ. वैशाली मेश्राम यांनी महाविद्यालयामध्ये सुरू झालेल्या कौशल्य विकास केंद्राबद्दल माहिती दिली व विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, केंद्र अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध कोर्सेस ला प्रवेश घेण्याचे आवाहन केले. प्रा. रुकेश पंचभाई यांनी महाविद्यालयामध्ये नव्याने सुरू होत असलेल्या The Comprehensive English Course बद्दल माहिती दिली व कोर्सला प्रवेश घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला प्रथम वर्षाचे कला आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी काम पाहिले तसेच आभारप्रदर्शन प्रा. डॉ. रविजीत गावंडे यांनी केले. दीक्षारंभ कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. दीक्षारंभ कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक ०३/०७/२०२४ ला विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन परिसराची माहिती तसेच प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. गुरुवार दिनांक ०४/०७/२०२४ विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभागांची माहिती देण्यात आली. शुक्रवार दिनांक ०५/०७/२०२४ रोजी विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विषय कसे निवडावे याबद्दल महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे डॉ. प्रशांत बागडे डॉ. वैशाली मेश्राम व डॉ. सचिन तेलखडे यांनी मार्गदर्शन केले.




बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात पालकसभा संपन्न
स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शनिवार दिनांक ०६ एप्रिल २०२४ रोजी सावरकर सभागृहामध्ये पालक सभा संपन्न झाली. या सभेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुळकर्णी, प्रमुख अतिथी प्रा.डॉ.हरिदास धुर्वे व कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. रविजीत गावंडे तर पालक प्रतिनिधी म्हणून संजय वानखडे, सुनील कळसइतकर, व्यासपीठावर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. वर्षा कुळकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य वाणिज्य विभागाचे प्रा.डॉ. हरिदास धुर्वे यांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद व्हावा जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाल्यास भविष्यात विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हाने किंवा समस्या राहतील त्यांना समर्थपणे त्यांचे निराकरण करण्यात मदत होईल, असे स्पष्ट केले. पालक प्रतीनिधी म्हणून सुनील वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना या महाविद्यालयात प्रवेश घेतल्या नंतर आपल्या मुलीमधे सकारात्मक बदल झाला आहे. त्या मुळे आम्ही समाधानी आहोत, असे सांगीतले. संजय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयात तासिका नियमित होतात. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता ग्रंथालयामधे उत्तम वाचन सुविधा आहे, असे आवर्जून नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकातून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. विद्यार्थांच्या समस्या जणून घेणे, पालकांना शिक्षकांकडून अध्यापनाबाबत काय अपेक्षित आहे हे समजून घेणे हा या पालक सभेचा उद्देश आहे असे प्रा.डॉ.रविजीत गावंडे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन बि.ए. भाग २ ची विद्यार्थिनी कु. दिपाली ठाकरे हीने.तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.रविजीत गावंडे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा.विजय दीक्षित, प्रा.डॉ. ताराचंद कंठाळे, प्रा.डॉ. सचिन जयस्वाल, प्रा.दत्तात्रय जोशी, प्रा.डॉ. सचिन तेलखेडे प्रा.डॉ. वैशाली मेश्राम, प्रा. गजानन लांजेवार ई. उपस्थित होते.
ग्रामगीता जीवन विकास परीक्षा संपन्न.
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ - राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज अध्यासन केंद्र मार्फत 20/02/2024 रोजी महाविद्यालयात ग्रामगीता
जीवन विकास परीक्षेचे आयोजन करण्यात आले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज यांची ग्रामगीता “आधुनिक युगाची संजीवनी बुटी” मानल्या जाते.
राष्ट्रसंतांच्या साहित्यावर आधारित ही परीक्षा 2014 पासून
महाविद्यालयात आयोजित करण्यात येते. महाविद्यालयाची “बेस्ट प्रॅक्टिस”
म्हणून ही परीक्षा अत्यंत उत्साहाने दरवर्षी महाविद्यालयात प्रा.
डॉ.ताराचंद कंठाळे, समन्वयक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन
केंद्र, यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येते. राष्ट्रसंतांच्या
साहित्याचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टिकोनातून आणि
विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संस्कारांची रुजवणूक होण्याच्या दृष्टीने ही
परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रसंत म्हणतात, “ग्रामगीता
नव्हे पारायणासि ! वाचता वाट दावी जनासि ! समूळ बदलवी जीवनासि ! मनी
घेता अर्थ तिचा !” या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसंतांच्या
साहित्याची रुची निर्माण व्हावी या हेतूने सदर परीक्षेला दरवर्षी
महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो. ह्या
परीक्षेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे आणि
प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी परिश्रम घेतले.




युवा पिढीने समाजभान ठेवण्याची गरज - प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील
आहे. स्वतःच्या जीवनात प्रचंड मेहनत, आशावाद, संयम आणि उच्चप्रतीची
गुणवत्ता या चतु:सूत्रीचा तरुणांनी अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे, असे
प्रतिपादन प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील यांनी केले. बाबाजी दाते कला
आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित युवा महोत्सव तरुणाई २०२४ चे उद्घाटक
म्हणून ते बोलत होते. "आई-वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, सर्व
सुविधा पुरविल्या तसेच गुरुजनांनी दिलेली शिकवण याबद्दल जीवनभर कृतज्ञ
असले पाहिजे. या सर्वांचा आदर कसा ठेवावा हे त्यांनी अनेक दाखले देऊन
विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य
डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध
उपक्रमांची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व पटवून
दिले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते यांनी
विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप
प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. संगीत विभागा तर्फे सरस्वती स्तवन
आणि स्वागत गीत सादर करण्यात आले. व्यासपीठावर विशुद्ध विद्यालय
संस्थेचे सचिव श्री विजय कासलीकर, सदस्य श्री महेश जोशी, विद्यापीठ
व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. हरिदास धुर्वे, सहसमन्वयक श्री
संजय त्रिवेदी आणि विद्यार्थी प्रतिनिधी रोहन गायकवाड उपस्थित होते. या
कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील नव्याने आचार्य मार्गदर्शक म्हणून
नियुक्त झालेल्या प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे, प्रा. डॉ. प्रशांत बागडे
आणि प्रा. डॉ. रवीजीत गावंडे तसेच विशेष पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ.
हरिदास धुर्वे, प्रा. डॉ. सचिन जयस्वाल आणि प्रा. डॉ. वैशाली मेश्राम
यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सर्व
विद्यार्थी वर्ग प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक युवक महोत्सव तरुणाई २०२४ चे समन्वयक प्रा डॉ. ताराचंद
कंठाळे यांनी केले उत्कृष्ट संचलन प्रा. वैशाली बेडेकर यांनी केले तर
आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी केले. कार्यक्रमाच्या
यशस्वीते करिता एनएसएस, एनसीसी आणि इतर स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता प्रा. डॉ. स्वाती जोशी यांनी सादर केलेल्या
पसायदानाने झाली
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा
सी. विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० च्या अंमलबजवणीमुळे
होणाऱ्या विद्यार्थी उपयोगी बदलांबाबत विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध
करून देण्याच्या अनुषंगाने शनिवार, दि. २०/०१/२०२४ रोजी स्वा. सावरकर
सभागृहात School Connect (NEP Connect) हा संपर्क अभियानाचा कार्यक्रम
आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा ध.
कुलकर्णी, प्रमुख उपस्थिती व्यवस्थापनाचे प्रतिनिधी वाणिज्य
महाविद्यालय यवतमाळ ट्रस्टचे अध्यक्ष श्री. विनायक दाते, संस्थेच्या
विश्वस्त सौ. सुषमा दाते, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य
म्हणून डॉ. हरिदास धुर्वे, व्यवस्थापन परिषद सदस्य, स.गा.बा. अ.
विद्यापीठ आणि डॉ. ताराचंद कंठाळे, सदस्य वाणिज्य भाषा मंडळ, आय. क़्यु.
ए. सी. समन्वयक डॉ. सचिन तेलखडे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी
विद्यापीठाद्वारे प्रशिक्षित साधन व्यक्ती म्हणून प्रा. डॉ. तुषार
कोटक, सहयोगी प्राध्यापक, वाणिज्य एस.पी.एम. सायन्स, गिलानी आर्ट्स,
कॉमर्स कॉलेज, घाटंजी हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना एन.
ई. पी. बद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले. विद्यार्थांनी एन. ई. पी.
बद्दल प्रश्न विचारून शंकानिरसन केले. प्रमुख वक्ते डॉ. तुषार कोटक
यांना प्राचार्य व उपस्थितांचे हस्ते Certificate of Appreciation
प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन डॉ. अमोल राऊत यांनी तर
आभारप्रदर्शन डॉ. सचिन जैस्वाल यांनी केले. कार्यक्रमाची सांगता
राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील
१६४ विद्यार्थी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते




महाविद्यालयात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
प्लेसमेंट सेल, जिल्हा उद्योग केंद्र आणि मिटकॉन यांच्या संयुक्त
विद्यमाने आज दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता सावरकर
सभागृहामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (जनजागृती अभियान)
आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. वर्षा कुळकर्णी, मार्गदर्शक मा. प्रतीक्षा नक्षणे, व्यवस्थापक, डी.
आय. सी. यवतमाळ, मा. श्री संदीप कोरडे, प्रकल्प अधिकारी, मिटकॉन, मा.
श्री प्रवीण रंगारी, इन्स्पेक्टर डी. आय. सी.यवतमाळ तथा समन्वयक म्हणून
प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे आणि प्रा. डॉ. सचिन तेलखडे मंचावर उपस्थित
होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागत
समारंभा नंतर समन्वयक प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी प्रास्ताविक केले.
आज राज्य व केंद्र शासनाच्या वतीने ज्या ज्या योजना राबविण्यात येतात
त्या समाजाभिमुख आणि विद्यार्थीभिमुख व्हाव्यात. विद्यार्थ्यांना
जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून राबविला जाणाऱ्या योजना अवगत
होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीचा ध्यास न करता रोजगार निर्मिती करून
इतरांना रोजगार देण्याचे प्रयत्न करावे असे मनोगत प्राचार्य डॉ. वर्षा
कुळकर्णी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.
अमोल राऊत तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. रविजीत गावंडे, शारीरिक शिक्षण
संचालक यांनी केले. या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी आणि प्राध्यापक
वृंद उपस्थित होते.


बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयचा युवा प्रेरणा शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग
विवेकानंद केंद्र यवतमाळ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारा अंतर्गत
विद्यार्थी विकसन उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी
स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आयोजित परीक्षेमध्ये तसेच विविध
शिबिरांमध्ये दरवर्षी सहभाग घेतात. यावर्षी सुद्धा स्वामी विवेकानंद
केंद्र कन्याकुमारी, विदर्भ विभाग द्वारा आयोजित युवा प्रेरणा
शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हे शिबिर श्री सदानंद
मठ सालोड जिल्हा वर्धा येथे ४ ते ७ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित
करण्यात आले होते. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती, समाज,
देश याबद्दल जाणीव निर्माण झाली. तसेच विविध खेळांमधून
विद्यार्थ्यांना सेल्फ मॅनेजमेंट, टीम वर्क कसे करायचे याचे प्रशिक्षण
मिळाले.


महाविद्यालयचा युवा महोत्सवामध्ये सक्रिय सहभाग
अमरावती विद्यापीठ दि. 10/10/2023 ते 13/10/2023 दरम्यान चाललेल्या
युवा महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांमध्ये प्राचार्य वर्षा कुलकर्णी
तसेच डॉ. वैशाली मेश्राम व डॉ. रविजीत गावंडे यांच्या मार्गदर्शनात
विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत रोहन गायकवाड, दिपाली ठाकरे,
आचल वरझडकर
व्यंगचित्र व स्पॉट पेंटिंग स्पर्धेत आदित्य वेरूळकर
वकृत्व स्पर्धेत तुषार दडांजे
वाद-विवाद स्पर्धेत मयुरी बोंद्रे व अर्थराज राठोड
उत्कृष्ट सादरीकरण केले. रांगोळी स्पर्धेत दिपाली
ठाकरे तर मेहंदी स्पर्धेत दामिनी बुटले यांनी कलाकृती
सादर केली.
त्याचप्रमाणे स्कीट, मुकनाट्य व एकांकीका मध्ये
आदित्य सोनटक्के ओम जोगदंड मोहीम सय्यद सिद्धेश माहुलकर वैष्णवी बगमारे
वेदिका भिलाई यांनी उत्कृष्ट कामगिरी केली तसेच
स्थळ स्थापनेमध्ये अविनाश ढेरे व ग्रुप यांनी जन्म या
विषयावर प्रतिकृती उभारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच
समुहगान मध्ये वैष्णवी व गृपने उत्कृष्ट गायन सादर
केले. त्याच प्रमाणे लोकनृत्य स्पर्धेमध्ये रश्मी
परसराम आणि ग्रुप यांनी उत्कृष्ट प्रकारे डांगी लोकनृत्य सादर करून
सर्वांची वाहवाह मिळवली.


बाबाजी दाते महाविद्यालयात दि. १४/०७/२०२३ रोजी दिक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन
१४/०७/२०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता दीक्षारंभ कार्यक्रम अतिशय उत्साहात
पार पडला. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. हरिदास धुर्वे यांनी आपल्या
प्रस्ताविकातून दीक्षारंभ कार्यक्रमा मागील भूमिका स्पष्ट केली.
त्यांनी महाविद्यालयातील विविध उपलब्ध सुविधांबद्दल विस्तृत माहिती
दिली तसेच शासनाच्या वेगवेगळ्या उपलब्ध शिष्यवृत्तींबद्दल मार्गदर्शन
केले. डॉ. सचिन तेलखडे यांनी महाविद्यालयातील विविध विभाग तसेच शिक्षक
आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परिचय करून दिला. दीक्षारंभ
कार्यक्रमाच्या अध्यक्ष, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा
कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या विकासासाठी
विद्यार्थ्यांची भूमिका कशी महत्त्वाची आहे हे पटवून दिले. तसेच
विद्यार्थ्यांना कुठल्याही अडचणी आल्यास त्यांच्या समस्यांचे निराकरण
करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला प्रथम वर्षाचे कला आणि वाणिज्य
शाखेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक
म्हणून वाणिज्य शाखेकडून प्रा. डॉ. हरिदास धुर्वे आणि कला शाखेकडून
प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी काम पाहिले. NSS विभागाच्या प्रमुख प्रा.
डॉ. वैशाली मेश्राम तसेच विद्यार्थी यांचे कार्यक्रमासाठी विशेष
सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा. डॉ. मंजुश्री नेवल
यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. रविजीत गावंडे यांनी केले. दीक्षारंभ
कार्यक्रम संपल्यानंतर प्रा. गजानन लांजेवार यांनी सर्व विभागांचा
परिचय करून दिला तसेच महाविद्यालयाचा परिसर विद्यार्थ्यांना दाखवला.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी
उपस्थित होते.




स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये गुरुवार दि.
८/१२/२०२२ रोजी सावरकर सभागृहामध्ये पालक सभा संपन्न झाली. पालक सभेचे
अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख, प्रमुख
अतिथी प्रा. डॉ. विवेक देशमुख, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. रविजीत
गावंडे, सह-समन्वयक प्रा. डॉ.अमोल राऊत तर पालक प्रतिनीधी म्हनुण श्री.
ढाले, श्री. चिंते व सौ. रंजना परसराम व्यासपिठावर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय
भाषणामध्ये शिक्षण, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सर्वगुण
संपन्न विद्यार्थी कसा घडेल. यासाठी दाते महाविद्यालय नेहमी प्रयत्नरत
असते असे विचार व्यक्त करून महाविद्यालयातील सर्व सुविधांचा आढावा
घेतला. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. विवेक देशमुख यांनी पालक, विद्यार्थी
आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद व्हावा जेणेकरून शिक्षण व्यवस्था अधिक
बळकट होईल व विचारू पद्धतीने अध्ययन व अध्यापनाचे काम सोयीस्कर होईल
असे विचार व्यक्त केले. श्री. ढाले यांनी महाविद्यालयीन शिक्षण केवळ
नोकरीसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व सुसंस्कारी व्हावे
यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. सामाजिक उपक्रमामध्ये दाते महाविद्यालय
नेहमीच सहभागी होण्याकरिता अग्रेसर असते, असे मत पालक प्रतिनिधी म्हणून
त्यांनी व्यक्त केले. सौ. रंजना परसराम यांनी मानवी मूल्यांची जोपासना
करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत
महत्त्वाची असते, असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी म्हणून केले. या
कार्यक्रमाच्या प्रास्तविकातून शिक्षक, विद्यार्थी, व्यवस्थापन आणि
पालक हे महाविद्यालयाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असून विद्यार्थ्यावर
योग्य संस्कार करण्याकरिता शिक्षकांबरोबरच पालकांची भूमिका तेवढीच
महत्त्वाची असते, असे विचार प्रा. डॉ. अमोल राऊत यांनी मांडले. या
कार्यक्रमाचे उकृष्ट सूत्र संचलन प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी केले तर
आभार प्रदर्शन प्रा.डॉ. रविजीत गावंडे यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ.
हरिदास धुर्वे, डॉ. स्नेहल डहाळे, डॉ. स्मिता शेंडे, प्रा. विनोद
तलांडे, प्रा डॉ. सचिन जयस्वाल, प्रा. विजय दीक्षित, प्रा.गजानन
लांजेवार प्रा. डॉ. वैशाली मेश्राम तसेच प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे
उपस्थित होते.
दाते कॉलेज मध्ये २०२२ युवक महोत्सव साजरा
आले. उद्घाटक म्हणून यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिलीप पाटील
भुजबळ लाभले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. विनायक दाते तर
प्रमुख अतिथी म्हणून श्री. सतिश फाटक, मा. सौ. सुषमा दाते, सौ.
शर्मिलाताई फाटक, श्री. विजय कासलीकर उपस्थित होते. तसेच प्राचार्य डॉ.
कल्पना देशमुख, प्रा. डॉ. विवेक देशमुख, प्रा. डॉ. हरिदास धुर्वे,
प्रा. दत्तात्रय जोशी, समन्वयक, युवक महोत्सव तसेच महेश शिरसाट,
अध्यक्ष, विद्यार्थी परिषद यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संगीत विभागाच्या चमूने शारदा स्तवन आणि
स्वागत गीत सादर केले. महाविद्यालयाची प्रार्थना “पसायदान” प्रा.डॉ.
स्वाती जोशी यांनी सादर केली. याच समारंभामध्ये दरवर्षी प्रकाशित होत
असलेल्या “प्रतिबिंब” या वार्षिकांकाचे प्रकाशन मा. उद्घाटक डॉ. दिलीप
पाटील भुजबळ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थांनी आपल्या समोर उदात्त ध्येय ठेवावे व त्यासाठी प्रयत्नांची
पराकाष्ठा करून यशाचे शिखर गाठावे” असे प्रतिपादन डॉ. दिलीप पाटील
भुजबळ,जिल्हा पोलीस अधिक्षक, यांनी केले. प्रा.डॉ.कल्पना देशमुख यांनी
विद्यार्थ्यांना युवक महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटावा परंतु जीवनातील
लक्ष्मण रेषेचे कायम पालन करावे असे आवाहन केले. संस्थेचे उपाध्यक्ष
श्री. सतीश फाटक यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये जीवनामध्ये यशाचा
कुठलाही शॅार्टकट नाही, तर चिकाटी आणि कठोर परिश्रम याला पर्याय नाही,
हे पटवून दिले. सिनेट सदस्य प्रा.डॉ. विवेक देशमुख यांनी आपल्या
शेरोशायरीयुक्त भाषणामधून विद्यार्थ्यांनी सातत्य आणि चिकाटीने
प्रगतीचे गौरीशंकर गाठावे, असे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय
भाषणामध्ये मा. श्री. विनायक दाते यांनी विद्यार्थ्यांना जीवनात
अभ्यास, व्यायाम आणि शिस्तपालन कसे आवश्यक आहे, हे हसत खेळत पटवून
दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. दत्तात्रय जोशी, संचालन
प्रा.डॉ. ताराचंद कंठाळे तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी
केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. दि. २७/०४/२०२२ रोजी
रांगोळी स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पोस्टर
डिझाईन, संस्कारभारती व थेंबाची रांगोळी इत्यादी प्रकारच्या
रांगोळ्यांचा समावेश होता. दिनांक २८ रोजी घेण्यात आलेल्या डिश
डेकोरेशन, आणि पुष्परचनेचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक मा.
डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. याच दिवशी भावगीत
स्पर्धा आणि बचाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवार दि. २९/०४/२०२२ रोजी ट्वीन्स स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि
सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी
वेगवेगळे कला प्रकार सादर केले. ग्रुप डान्स, रिमिक्स डान्स, पथनाट्य ,
ड्युयेट डान्स, गोंडी डान्स, लघुनाटिका, गोंधळ, मसा नृत्य , पंजाबी
नृत्य, लावणी नृत्य आणि योगानृत्य इत्यादी सादर करण्यात आले. शनिवार
दि. ३०/०४/२०२२ रोजी कविसंमेलन, वादविवाद स्पर्धा आणि सांस्कृतिक
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वादविवाद स्पर्धेचा विषय:-
सभागृहाच्या मते, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व
विकासात भ्रमणध्वनी (मोबाईल) चे स्थान मोलाचे आहे” हा होता. रविवार
दि. ०१/०५/२०२२ रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक
विद्यार्थ्यांनी यामध्ये स्टॉल्स लावले. महाविद्यालयातील शेकडो
विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्याला प्रतिसाद दिला. आनंद मेळाव्यानंतर
विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह व
प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरणाने या युवक
महोत्सवाची सांगता झाली.

करीयर कट्टा कार्यक्रमा अंतर्गत “विद्यार्थी विकास कार्यशाळा”
प्राचार्य डॉ.कल्पना देशमुख यांचे सहकार्याने करीयर कट्टा कार्यक्रमा
अंतर्गत “विद्यार्थी विकास कार्यशाळा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात
आला. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक श्री यशवंत जी शितोळे हे होते
त्यांनी IAS आपल्या भेटीला, व आपल्या भेटीला, ह्या दोन्ही संकल्पना
समजावून सांगितल्या. तसेच यामध्ये कोणी पात्र होऊ शकत नसेल त्यांच्या
साठी दोन तीन महिन्याचे प्रमाणपत्र कोर्स on line प्रशिषण घेऊन स्वतः
उद्योग करू शकतो. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ अमोल राऊत यांनी
भूषविले.संचालन डॉ.ताराचंद कंथाले यांनी केले प्रमुख उपस्थिती .डॉ.सौ.
जीवने मॅडम, डॉ.रोहित वणकर, डॉ.विवेक देशमुख, डॉ.सचिन तेलखडे होते.
आभार प्रदर्शन डॉ. हरिदास धुर्वे यांनी केले.कार्यक्रमास ७४ विद्यार्थी
उपस्थित होते
