बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

NSS – “मेरी माटी मेरा देश” अंतर्गत शहिदो को नमन – OLD

"मेरी माटी मेरा देश" अंतर्गत "अमृत कलश"

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'मेरी माटी मेरा देश' या शासकीय उपक्रमांतर्गत माती संकलन कार्यक्रमाचे आयोजन दि. 20/09/2023 रोजी प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या गावांतून माती आणून अमृत कलशामध्ये टाकण्याचे महत्व समजावून सांगितले व प्रत्येक विद्यार्थ्यांना सेल्फी काढून ठराविक संकेतस्थळावर अपलोड करावे असे आवाहन केले.
राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी डॉ.सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना सेल्फी अपलोड करणाऱ्या संकेतस्थळाची सविस्तर माहिती देऊन संकेतस्थळावरच्या तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या.
तसेच शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. रवीजीत गावंडे यांनी विद्यार्थ्यांना अमृत कलशामधील माती दिल्लीतील अमृत वाटिका तयार करण्यासाठी काय भूमिका बजावते हे सविस्तर समजावून सांगितले व शिस्तीत कलशात माती टाकण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक  व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अमृत कलशामध्ये माती टाकून पंचक्रोशातील मातीचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

दत्तक ग्राम चापर्डा येथे स्वच्छता आणि वृक्षारोपण

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या चमुने दत्तक ग्राम चापर्डा येथे  दि. 12/09/2023 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना दत्तक ग्राम चापर्डा येथे स्वयंसेवकांनी गावाची स्वच्छता करून गावात वृक्षारोपण केले, यावेळी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व ग्राम स्वच्छते मागचा  उद्देश  सांगून मेरी माटी मेरा देश मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना दत्तक ग्रामात राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली व स्वयंसेवकांना विविध उपक्रमांसाठी प्रोत्साहित केले.
जि.प.प्राथमिक मराठी शाळा   चापर्डा येथील इयत्ता १ ते ७ मधल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ. स्वाती पाटील व डॉ. सारीका शहा यांनी करून विद्यार्थ्यांना औषधीचे वाटप केले. तसेच शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले व शाळेतील विद्यार्थ्यांना आणि संबंधित परिसरातील महिलांना पोषक पदार्थ वाटप करून त्याचे महत्त्व सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. डगवार, अंगणवाडी शिक्षिका प्रतिज्ञा मोटघरे, प्राथमिक शिक्षिका प्रेमलता आत्राम, ज्ञानभुमी व्यवस्थापक प्रकाश कांबळे व रा.से.यो. स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन

बाबाजी दाते  कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वाघाडी परिसर  येथे  दि.10/09/2023 रोजी प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी स्वयंसेवकांना श्रमदानाचे महत्त्व सांगून देशाप्रती त्यांची असलेली भूमिका त्यांना पटवून दिली.  तसेच सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रम घेण्यामागचा हेतू सांगून संबंधित परिसरात करावयाच्या कामाचा आढावा दिला.
संबंधित परिसरामध्ये रा.से.यो. च्या स्वयंसेवकांनी स्वच्छता केली व संबंधित परिसरातील वाघाडी नदीच्या पात्रा मध्ये  दोन ते अडीच हजार मुर्ती चुकिच्या पद्धतीने विसर्जीत झाल्या होत्या. भग्नावस्थेतील मुर्ती, पाण्यात कुजलेले निर्माल्य, प्लास्टीक, कचरा अशा मोठ्या प्रमाणात स्वच्छतेची धुरा राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पार पडली आणि येत्या काळामध्ये विसर्जनासाठी हौद उभारण्याचे आश्वासन दिले.
सोबतच वाघाडी परिसरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सिडबॉल फेकून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रा. हेमा गुल्हाणे, रोहन गायकवाड, दिपाली ठाकरे, रश्मी परसराम, तुषार धडांजे, विठ्ठल कुर्हाडकर, ह्यांनी परीश्रम घेतले.

"मेरी माटी मेरा देश" अंतर्गत शहिदो को नमन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविदयालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या  विद्यार्थ्यांनी दि. 14/8/23 "मेरी माटी मेरा देश" अंतर्गत शहिदो को नमन करण्यासाठी रॅली चे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थांना रॅलीमागचा उद्देश सांगुन हे एक सामाजीक कर्तव्य असल्याचे सांगीतले, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी हुतात्म्यांना स्मरण करणे आपले कर्तव्य असुन सर्वांनी देशाप्रती आपली जबाबदारी ओळखावी हे सांगीतले, शाररीक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. रविजीत गावंडे ह्यांनी युवकांनी शिस्तीचे पालन करून देशसेवा हीच इश्वर सेवा मानावी असे आव्हान केले. सदर रॅलीसाठी प्रा. गुल्हाणे प्रा. मेश्राम ह्यानी सहकार्य केले

स्वामी विवेकानंद चरित्र व संदेश आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने दिनांक 12-8-2023 रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्य स्वामी विवेकानंद चरित्र व संदेश आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी स्वामी विवेकानंदांनी युवकांना दिलेला संदेश सांगून, पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले श्री दीपक केसकर यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदाचे चरित्र उलगडून दाखवून त्यांनी युवा वर्गाला त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली. तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी स्वामींची विचारधारा त्यांची पुस्तके कसे सहाय्य करतात हे सविस्तर सांगितले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले अॅड. गटलेवार उपाध्यक्ष रामकृष्ण मिशन आश्रम यवतमाळ यांनी विद्यार्थ्यांना पुस्तक रथाची माहिती देऊन पुस्तके व्यक्तिमत्व घडविण्यासाठी कसे उपयोगाची आहे हे सांगितले. तसेच मंचावर अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विवेकानंदांची विचार युवा पिढी घडविण्यासाठी प्रेरक भूमिका बजावत असून विद्यार्थी जीवनात दिशा देण्याचे काम करतात. हे पटवून दिले. संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पार पडला.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली ठाकरे हिने तर आभार प्रदर्शन पायल सुरपाम हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. हेमा गुल्हाने, रोहन गायकवाड, रोशन गायकवाड, तुषार दडांजे, प्रशिक भस्मे, गोपाल राठोड यांनी परिश्रम घेतले

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनाचा उद्बोधन वर्ग दिनांक 02/08/2023 रोजी घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधन वर्ग घेण्या मागचा हेतू सांगून मार्गदर्शक पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले अमर अनिल कतोरे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेतून करण्यात येणाऱ्या कार्याच्या विविध संधी व विविध उपक्रमांच्या सविस्तर माहिती देऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य समाज घडवण्यासाठी कसे उपयुक्त आहे हे सांगितले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रा. गजानन लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी जीवनासाठी एक शिस्त लावण्याचे माध्यम असून त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची प्रगती साधल्या जाते हे सांगितले . रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ.सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे नियम समजावून सांगितले मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. हेमा गुल्हाने उपस्थित होत्या.
याच वेळी विविध स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले तसेच राष्ट्रीय सेवा योजना डायरी व बॅचेस चे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी कोकरे हिने तर आभार प्रदर्शन तनुजा उगेमुगे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता रश्मी परसराम, दिपाली ठाकरे ,वैष्णवी बगमारे ,भाग्यश्री राठोड , रोहन गायकवाड ,तुषार दंडाजे , विठ्ठल कुऱ्हाडकर यांनी परिश्रम घेतले.

 

"नवीन शैक्षणिक धोरण 2020" या विषयाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या विद्यमाने दिनांक 24-7-2023 ते 29-7-2023 या कालावधीमध्ये "नवीन शैक्षणिक धोरण 2020" या विषयाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा विषय "नव शैक्षणिक धोरण फायद्याचे की तोट्याचे" हा होता. यामध्ये एकूण 23 निबंध प्राप्त झालेले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक भारती छापेकर (बीए भाग 3), द्वितीय क्रमांक पायल सुरपाम (बीए भाग २), तृतीय क्रमांक रश्मी परसराम (बीए भाग 3) व प्रोत्साहन पर बक्षीस गायत्री दुबे (बीए भाग 1)हिने पटकावले. पोस्टर स्पर्धेचा विषय "नव शैक्षणिक धोरण" हा होता यामध्ये एकूण 20 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यामध्ये प्रथम क्रमांक प्रशिक भस्मे (बीए भाग 1), द्वितीय क्रमांक रोहन गायकवाड (बीए भाग 3), तृतीय क्रमांक दिपाली ठाकरे (बीए भाग 2) तर प्रोत्साहन पर बक्षीस देवयानी वानखडे (बीए भाग 1) हिने पटकावला.
वकृत्व स्पर्धेचा विषय "नवीन शैक्षणिक धोरण 2020" हा ठेवण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तुषार हंडाजे (बीए भाग 1), द्वितीय क्रमांक रोहन गायकवाड (बीए भाग 3), आणि तृतीय क्रमांक दिपाली ठाकरे (बीए भाग 2) यांनी पटकावला. वकृत्व स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक हेमा गुल्हाने यांनी केले.
त्याचप्रमाणे रिल्स व शॉट व्हिडिओ स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये चॅम्पियन ग्रुपने पारितोषिक पटकावले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना सांगून स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रेरित केले तर सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणाविषयी सविस्तर माहिती देऊन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. स्पर्धेत विजयी स्पर्धकांना पारितोषिके वितरण करण्यात आली.

 

राष्ट्रीय सेवा योजनेची ओवी ट्रस्ट ला भेट

रा.से.यो. विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचे महत्त्व समजावून सांगण्याकरिता दि२८/३/२०२३  रोजी प्राचार्य डॉ. विवेक देशमुख यांच्या मार्गदर्शनात धनगरवाडी येथे ओवी ट्रस्ट चालवत असलेल्या बालनगरी या सामाजिक उपक्रमाला भेट आयोजीत करण्यात आली व ज्ञानरचनावादातून शिक्षण कसे दिले जाते हे विद्यार्थ्यांनी समजून घेतले तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले.  ओवी ट्रस्ट च्या संचालिका प्रणाली बोंदाडे यांनी विद्यार्थ्यांना ट्रस्ट स्थापनेमागचे उद्दिष्टे सांगितले व ज्ञानरचनावादातून विद्यार्थ्यांना कसे ज्ञान दिले जाते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच धम्मानंद सर यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळा द्वारे शिक्षण कसे दिले जाते हे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना भेटी मागचा उद्देश सांगून प्रत्येकाने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम  आपल्या गाव स्तरावर राबवावे असा संदेश दिला, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना हा उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणा देऊन खेळातून शिक्षण ही संकल्पना समजवून सांगीतली, तसेच प्रा. सारिका नंदे यांनी विद्यार्थ्यांना आशा उपक्रमाद्वारे समाजामध्ये मानाचे स्थान कसे मिळू शकते हे सविस्तर समजावून सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी या भेटीतुन स्फूर्ती घेऊन असे उपक्रम राबवण्याचे आश्वासन देऊन धनगर वाडीचा निरोप घेतला.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता रोहन गायकवाड, रश्मी परसराम, सृष्टी येडमे, दिपाली ठाकरे, उल्हास चव्हाण, सिद्देश माहुलकर यांनी परिश्रम घेतले.

सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना व गृहअर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे आयोजन दि. 03/01/ 2023 रोजी प्राचार्य डॉ कल्पना देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी व गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यांवर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती देवून शिक्षणाचा मूलमंत्र जपावा असा संदेश दिला.
प्रमुख वक्ता म्हणून बोलताना इतिहास विभाग प्रमुख प्रा.गजानन लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी उभारलेल्या पहिल्या शाळेचा इतिहास उलगडून सांगितला व विद्यार्थ्यांनी त्यांनी केलेल्या परिश्रमाचे फलित करावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषण करतांना रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थिनींनी विविध क्षेत्र काबीज करून सावित्रीबाई फुले यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार केले असे म्हणून महिलांना समाजामध्ये कसे विशेष स्थान आहे हे विविध उदाहरणांनी उलगडून सांगितले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा उगेमुगे हिने तर आभार प्रदर्शन काजल पोहनकर हिने केले. कार्यक्रमाचे यशस्वीते  करिता रोहन गायकवाड, मंगेश लोंढे, रंजित वाघमारे, निर्जला द्विवेदी, प्रत्युशा पाटील व वैष्णवी बुल्ले यांनी परिश्रम घेतले.

मानवाधिकार दिनाचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 10/12/2022 रोजी मानवाधिकार दिन प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला  मानवाधिकार दिनानिमित्य राज्यशास्त्र अभ्यास मंडळ उद्घाटन व अमरावती विद्यापीठात निवडुन आलेल्या डॉ. हरीदास धुर्वे व डॉ. ताराचंद कंठाळे याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना राज्यशास्त्र विभाग प्रमुख व रा.से. यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास मंडळ स्थापनेमागचे उद्दीष्टये सांगुन मानवाला असलेले अधिकार या बद्दल सविस्तर माहिती दिली.
सत्कारमुर्ती वाणिज्य विभागातील व अमरावती विद्यापीठ सिनेटवर निवडून आलेले डॉ. हरिदास धुर्वे यांनी  विद्यार्थ्यांना ध्येय निश्चिती कशी करायची हे सांगुन विद्यार्थी  जीवनात आचरणात येणाऱ्या विविध  गोष्टींची माहिती दिली तसेच दुसरे सत्कार मुर्ती अमरावती विद्यापीठ कॉमर्स भाषा अभ्यास मंडळावर निवडून आलेले डॉ. ताराचंद कंठाळे यांनी विद्यार्थ्यांना मानवता धर्म कसा आचरणात आणता येईल हे सांगुन विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना अधिकार व कर्तव्ये ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असुन विद्यार्थ्यांनी त्या प्रति जागरूक रहावे व संवीधानिक अधिकार  माहिती करून घ्यावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी माकोडे हिने तर आभार प्रदर्शन सौरभ जाधव याने केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता  NSS दाते वॉरियर्स या ग्रुप ने परिश्रम घेतले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा सशस्त्र सेना ध्वज दिनी सहभाग

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा सशस्त्र सेना ध्वज दिनी सहभाग.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय  यवतमाळ यांच्यावतीने श्री सत्य साई क्रिडा रंजन सभागृह नंदुरकर विद्यालय यवतमाळ येथे  सशस्त्र सेना ध्वज दिन समारोहाचे आयोजन दि. 07/12/2022 रोजी करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात युद्ध विधवा वीर माता यांचा सत्कार करण्यात आला.  सदर कार्यक्रम हा वर्षातून एकदाच राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम व सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे  नियोजन करून मोलाचा हातभार लावला. त्याकरिता उपस्थित माजी सैनिकांनी व आयोजकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनमध्ये सृष्टी येडमे, अंजू गारगाटे, नेहा खरात, ओम जोगदंड, ज्योती मेश्राम, कृतिका भगत यांचा समावेश होता

संविधान दिनाचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26/11/2022 रोजी संविधान दिन प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगून तो साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली प्रमुख मार्गदर्शक म्हणुन लाभलेले प्राध्यापक सुरेश आडे यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील विविध घटक स्पष्ट केले. तसेच संविधान तयार होण्यामागचा इतिहास समजावून सांगितला, व विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगितले.
अध्यक्षीय भाषणामध्ये रा.से.यो. सह कार्यक्रम अधिकारी व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन जयस्वाल यांनी संविधांनाच्या उद्देशिके मध्ये असलेल्या विविध बाबीचा उलगडा केला व उद्देशिकेचे वाचन करून शपथ देण्यात आली.
रा.से.यो चा विद्यार्थी सुमित आत्राम याने उद्देशिकेवर आधारित गीत सादर केले तसेच स्वयं सेवकांना उत्कृष्ट कार्याबददल प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता पब्लिक सर्व्हेन्ट ग्रुप यानी परिश्रम घेतले.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्लास्टिक कचरा जनजागृती

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय  यवतमाळ राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महाविद्यालय परिसर व महाविद्यालयाच्या आजुबाजुच्या परिसरातील  प्लास्टिक कचरा जनजागृती व प्लास्टीक कचरा गोळा करण्याचे अभियान दि. २०/१०/ २०२२ रोजी राबवण्यात आले.
सदर संकलनात एकूण ३० ते ३५ किलोग्रॅम  प्लास्टिक कचरा संकलन करण्यात येऊन नगरपरिषद यवतमाळ कचरा व्यवस्थापन यंत्रणेकडे योग्य विल्हेवाट करण्याकरिता सोपविण्यात आला. परिसरातील   स्थानिक नागरिक व दुकानदारांमध्ये प्लास्टिक पिशवी विक्री व विल्हेवाट याबाबत जाणीव जागृती करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक रा. से.यो.चे कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल मंगेश लोंढे, रोहन गायकवाड, सृष्टी येडमे, सपना चव्हाण, करण भांगे, अभिषेक टेंबरे समवेत एकुण ३६ राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकानी सक्रिय सहभाग नोंदविला.

महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने दिनांक 02 / 10/ 2022 रोजी मातोश्री वृद्धाश्रम येथे गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली
मातोश्री वृद्धाश्रम निळोना येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी स्वयंसेवकांना म.गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जिवनाचे ध्येय व उद्दिष्टे सांगुन रा.से.यो. स्वयंसेवकांना स्वच्छतेचा संदेश दिला.
रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी वृद्धाश्रम भेटीचे उद्दीष्ट्ये सांगुन 2 ऑक्टोबर ला स्वच्छता मोहीम राबवून म. गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची खरी जयंती साजरी करता येईल हे स्पष्ट केले व सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली.
रा.से.यो. स्वयंसेवकांनी संपूर्ण वृद्धाश्रम स्वच्छ करून वृद्धांच्या व्यथा जाणुन घेतल्या व वृद्धांना जेवू  घातले. या वेळी शासन अधिकारी श्री. ढेंगे, डॉ. सारंग मेश्राम यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले
संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतुन यशस्वी झाला. यासाठी रोहन गायकवाड, तेजस राउत, अयान, वैष्णवी कोकरे, मोहीन सैय्यद, प्रार्थना इंगोले, दिपाली ठाकरे, राखी मैंद, रश्मी परसराम, खुशी नंदनवार, ओम जोगदंड, आदित्य सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय सेवा योजनाच्या अंतर्गत व्यसन मुक्ती जनजागृती

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनाच्या अंतर्गत दिनांक 30/09/2022 रोजी व्यसन मुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना व्यसन अधोगतीला कसे कारणीभुत ठरते व विद्यार्थी जीवनात त्याचे कसे पडसाद उमटतात हे सांगुन मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची भुमिका काय आहे हे सांगितले
प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले मानसिक रोगतज्ञ  डॉ. जाधव यांनी विद्यार्थ्यांना व्यसन कसे लागु नये व लागल्यास कसे सोडवावे याचे सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांशी हितगुज करून समस्या जाणुन घेतल्या. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. शहा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वेळीच सावध होण्याचा मंत्र देऊन व्यसन लागु न देण्यासाठी कसे परावृत्त व्हावे हे सांगितले व विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन व्यसन मुक्तीचा मार्ग अवलंबण्याचे विद्यार्थ्यांकडून आश्वासन घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी कोकरे हिने तर आभार प्रदर्शन मोहीन सैय्यद यांने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आदित्य सोनटक्के, ओम जोगदंड, गौरव पाटील, सिद्धेश माहुलकर, परिंदा भगत, प्रांजली लढे, तेजस नाईक, नेहा शेखापुरे, निशा बेंदेवार यांनी परिश्रम घेतले.

 

रान भाजी, वन औषधी व पोषक अन्न प्रदर्शनी

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील गृहअर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय योजना यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण महिन्या अंतर्गत दि. 30/09/2022 रोजी रान भाजी, वन औषधी व पोषक अन्न प्रदर्शनी व माहिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रा. से.यो.कार्यक्रम अधिकारी तथा गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थी व आलेल्या पाहुण्यांना रान भाज्यांचे महत्व तसेच वन औषधी घेतल्याने कसा फायदा होतो हे सांगुन प्रदर्शना मागची भुमिका स्पष्ट केली. रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना सुदृढ राहण्यासाठी सकस आहार कसा गरजेचा आहे हे सांगुन विद्यार्थ्यांनी लावलेल्या प्रदर्शनीचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता दिपाली ठाकरे, राखी मैंद, रश्मी परसराम, प्रार्थना इंगोले, संपना निमसरकार, प्रेरणा पाटील, सृष्टी येडमे, खुशी नंदनवार, पलक भगत यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय योजनेचा वर्धापन दिन कार्यक्रम दिनांक 27/09/ 2022 रोजी आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या शिवशक्ती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा हेतु व नियमित कार्यक्रम व शिबिरा अंतर्गत उपक्रम याची सविस्तर माहिती दिली व व्यक्तीमत्व विकास घडविण्यासाठी विद्यार्थी जिवनामध्ये सातत्य व परिश्रम आवश्यक आहे हे सागितले .
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना  वर्धापन दिन साजरा करण्यामागचा हेतु सांगुन वर्षभर समाज सेवा कशी करावी हे सांगितले तर अध्यक्षीय भाषणातून डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना व्यक्तीमत्व विकासासाठी कशी आवश्यक आहे व त्यातुन सामाजिक बांधिलकी कशी जपता येईल हे समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली ठाकरे हिने तर आभार प्रदर्शन रश्मी परसराम हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहन गायकवाड, पलक तेलंग,  प्रार्थना इंगोले, सुजल खंडारकर, सौरभ जाधव, ओम जोगदंड, कोमल काळे, उल्हास चव्हाण यांनी परिश्रम घेतले

नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या मार्फत आयोजित जिल्हास्तरीय युवा मोहत्सवमध्ये सहभाग

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय योजनेच्या विद्यार्थ्यांचा नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या मार्फत दिनांक 24/09/2022 रोजी आयोजित जिल्हास्तरीय युवा मोहत्सवमध्ये विविध स्पर्धेत सहभाग. वकृत्व स्पर्धेत तन्मय पुरके, चित्रकला स्पर्धेत दिपाली ठाकरे, मोबईल फोटोग्राफी मध्ये संध्या किनाके, कविता स्पर्धेत, योगेश महाजनकार व प्राची आडे तर युवा संवाद मध्ये सृष्टी येडमे यांनी सहभाग नोदवला.
जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत सहभागी चमुने तिसरा क्रमांक पटकावत स्मृती चिन्ह व रोख परीतोषिक पटकावले.
मोहत्सवाला उपस्थित असलेले जिल्हधिकारी श्री. अमोल येडगे, राज्यमंत्री संजय राठोड, माननीय आमदार मदन भाऊ येरावार, नेहरू युवा केंद्राचे प्रमुख अनिल ढेंगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
युवा मोहत्सव यशस्वी करण्याकरिता वैष्णवी बुल्ले , मंगेश लोंडे , प्रिया दोणाडकर , राखी मैंद, उल्हास चव्हाण , साहिल घोडेस्वार, अभय उलमाले इत्यादींनी परिश्रम घेतले.

नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या मार्फत आयोजित जिल्हास्तरीय युवा मोहत्सवमध्ये सहभाग

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय योजनेच्या विद्यार्थ्यांचा नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या मार्फत दिनांक 24/09/2022 रोजी आयोजित जिल्हास्तरीय युवा मोहत्सवमध्ये विविध स्पर्धेत सहभाग. वकृत्व स्पर्धेत तन्मय पुरके, चित्रकला स्पर्धेत दिपाली ठाकरे, मोबईल फोटोग्राफी मध्ये संध्या किनाके, कविता स्पर्धेत, योगेश महाजनकार व प्राची आडे तर युवा संवाद मध्ये सृष्टी येडमे यांनी सहभाग नोदवला.
जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत सहभागी चमुने तिसरा क्रमांक पटकावत स्मृती चिन्ह व रोख परीतोषिक पटकावले.
मोहत्सवाला उपस्थित असलेले जिल्हधिकारी श्री. अमोल येडगे, राज्यमंत्री संजय राठोड, माननीय आमदार मदन भाऊ येरावार, नेहरू युवा केंद्राचे प्रमुख अनिल ढेंगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
युवा मोहत्सव यशस्वी करण्याकरिता वैष्णवी बुल्ले , मंगेश लोंडे , प्रिया दोणाडकर , राखी मैंद, उल्हास चव्हाण , साहिल घोडेस्वार, अभय उलमाले इत्यादींनी परिश्रम घेतले.

नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या मार्फत आयोजित जिल्हास्तरीय युवा मोहत्सवमध्ये सहभाग

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय योजनेच्या विद्यार्थ्यांचा नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या मार्फत दिनांक 24/09/2022 रोजी आयोजित जिल्हास्तरीय युवा मोहत्सवमध्ये विविध स्पर्धेत सहभाग. वकृत्व स्पर्धेत तन्मय पुरके, चित्रकला स्पर्धेत दिपाली ठाकरे, मोबईल फोटोग्राफी मध्ये संध्या किनाके, कविता स्पर्धेत, योगेश महाजनकार व प्राची आडे तर युवा संवाद मध्ये सृष्टी येडमे यांनी सहभाग नोदवला.
जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत सहभागी चमुने तिसरा क्रमांक पटकावत स्मृती चिन्ह व रोख परीतोषिक पटकावले.
मोहत्सवाला उपस्थित असलेले जिल्हधिकारी श्री. अमोल येडगे, राज्यमंत्री संजय राठोड, माननीय आमदार मदन भाऊ येरावार, नेहरू युवा केंद्राचे प्रमुख अनिल ढेंगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
युवा मोहत्सव यशस्वी करण्याकरिता वैष्णवी बुल्ले , मंगेश लोंडे , प्रिया दोणाडकर , राखी मैंद, उल्हास चव्हाण , साहिल घोडेस्वार, अभय उलमाले इत्यादींनी परिश्रम घेतले.

शेतकऱ्यांना डिजीटल पीक पाहणी व माहिती ॲपद्वारे भरणे

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय योजना अंतर्गत दि.17/9/22 रोजी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना डिजीटल पीक पाहणी व माहिती ॲपद्वारे भरणे या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वैशाली मेश्राम व डॉ. सचिन जयस्वाल ह्यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी डिजीटल पीक पाहणी व माहिती भरणे मोहिम सुरू केली आहे परंतु अजुनही बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती भरता येत नाही त्यामुळे त्यांना अनेक अडचणी येताना दिसून आल्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना या सर्व बाबींची माहिती मडकोणा या गावी देण्यात आली.  प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले
प्रशिक्षणा दरम्यान गावाच्या तलाठी आंबेकर तर सरपंच नरेश ढोरे ह्याचे मार्गदर्शन लाभले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायती कडुन सर्टिफिकेट देवून गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमा करिता दिपाली ठाकरे, राखी मैंद, शिल्पा तालेकर, ओम जोगदंड, अभय उलमाले यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत लसीकरण शिबीर

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत लसीकरण शिबीराचे आयोजन दि. 24/08/2022 रोजी प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
या शिबीरामध्ये महाविद्यालयीन  विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना  कोव्हॅक्सीन , कोवीशील्ड व बुस्टर डोस देण्यात आला. शिबीरामध्ये  २०० लोकांचे लसीकरण करण्यात आले.
शिबीराच्या यशस्वीतेकरिता रा. से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम , सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थांनी परिश्रम घेतले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - हर घर तिरंगा

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नीत बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविदयालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि 13/8/22 रोजी आजादी का अमृत महोत्सव व हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानात यवतमाळ शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व्दारा आयोजीत रॅलीने देशप्रेमाचा संदेश यवतमाळकरांना देण्यात आला.
रॅली मध्ये विद्यार्थानी संत गाडगेबाबां, महात्मा गांधी,  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कस्तुरबा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, अशा विविध वेषभूषेतुन देशभक्तीचा संदेश जनतेला देण्यात आला तसेच चौकाचौकात नृत्यांतुन हरघर तिरंगा संदेश देवून जनतेचे लक्ष वेधण्यात आले.
हजारोच्या संख्येने विद्यार्थी वर्ग स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपल्या संपूर्ण शक्तीने साजरा करण्यासाठी एकत्रित आला होता. जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे ह्यानी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला तसेच यवतमाळ जिल्ह्याचे रा से. यो जिल्हा समन्वयक डॉ. रत्नदिप गंगाळे ह्यांनी रॅलीचे नेतृत्व केले यावेळी संपूर्ण महाविद्यालयातील रा.से. यो कार्यक्रम अधिकारी, सहकार्यक्रम अधिकारी उपस्थित होते
दी १२/८/२०२२ रोजी वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली वकृत्व स्पर्धेचा विषय “देशाप्रती माझी असलेली भूमिका” हा होता. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रम अधिकारी डॉ वैशाली मेश्राम ह्यांनी स्पर्धा मागचा हेतू सांगून विद्यार्थ्यानी देशाप्रती आपले कर्तव्य अविरत पणे पार पाडावे असे प्रतिपादन केले प्रमुख अतिथी व परीक्षक म्हणून बोलताना रा.से.यो. सह कार्यक्रम अधिकारी डॉ सचिन जयस्वाल ह्यांनी विद्यार्थ्यांना विविध समाज सेवकांचे कार्य सांगून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी त्यांना स्मरण करणे प्रत्येक विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे असे सांगितले वकृत्व स्पर्धे मधून तीन क्रमांक काढण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करीता वैष्णवी कर्णेवार, दिपाली ठाकरे, खुशी नदंनवार यांनी परिश्रम घेतले.
९/८/२०२२ रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी देशभक्तीपर “पोस्टर बनाओ” स्पर्धा आयोजित करण्यात आली
या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला, आलेल्या पोस्टर मधून तीन क्रमांक काढण्यात आले ,राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी विद्यार्थ्यांना पोस्टर तयार करण्यामागचा हेतू सांगून देशा प्रती विद्यार्थ्यांची असलेली भूमिका स्पष्ट केली,  विद्यार्थ्यांनी प्रत्येक घरी तिरंगा लावावा व थोर नेत्यांची स्वातंत्र्या मागची भूमिका जाणून घ्यावी असे आवाहन रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ सचिन जयस्वाल  ह्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करीता निखिल होलगरे ,सुज्वल खंडाळकर, प्रार्थना इंगोले, नेहा पवार,स्नेहल मडगुलवार, रश्मी परसराम, यांनी परिश्रम घेतले

दाते कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे दि. 21/06/2022 रोजी शारीरिक शिक्षण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते हे होते त्यांनी योगाभ्यास व प्राणायाम दैनंदिन जीवनासाठी कसे आवश्यक आहे हे सांगून योगाभ्यासाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले. शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. रविजीत गावंडे यांनी प्राणायाम तसेच योगाभ्यास घेतला. प्रस्तुत कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रोहन गायकवाड , उमेश कांबळे, कोमल काळे , निशांत मडावी यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज मध्ये शिवस्वराज्य दिन साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 06/06/2022 रोजी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम या होत्या. त्यांनी प्रास्ताविकातून शिवस्वराज्य दिनाची भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांना शिवरायांचे कार्य सर्वसामान्य जनतेसाठी कसे प्रेरक होते हे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री सुनील भीष्म यांनी विद्यार्थ्यांना इतिहास कालीन प्रसंगाचे स्मरण करून विविध घटना जिवंत केल्या व पुस्तक वाचून ज्ञान वृद्धिंगत करण्याचा संकल्प दिला.
इतिहास विभाग प्रमुख प्रा. गजानन लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना इतिहास कालीन बाबींचे स्मरण करून देऊन इतिहासातील विविध स्मारके व किल्ले यांचे जतन करून नवीन पिढीला त्यांचा प्राचीन वारसा जपण्याचा संदेश दिला.  शिवस्वराज्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या किल्ले बनाओ व शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील स्केच स्पर्धेत बक्षीस प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना शिल देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पिता खोब्रागडे हिने केले तर आभार  प्रार्थना इंगोले हिने मानले . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता साक्षी चव्हाण,  रोहन गायकवाड, मनिषा मोकासे, दिशा आडे, माहेश्वरी आत्राम, सृष्टी येडमे, दादाजी किनकर, रश्मी परसराम, निशांत मडावी, प्रज्वल मेश्राम, शितल पोटे, खुशी नंदनवार यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज मध्ये पर्यावरण जनजागृती स्वच्छता सप्ताह समारोप कार्यक्रम

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत पर्यावरण जनजागृती स्वच्छता सप्ताह  साजरा करण्यात आला.  सप्ताहाचे उद्‌घाटन दि. 31/05/2022 रोजी प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांच्या हस्ते झाले. सप्ताहाचे अंतर्गत रोज महाविद्यालयातील विविध भागांची स्वच्छता करण्यात आली व स्वच्छतेचा संदेश सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आला. सप्ताहाचा समारोप कार्यक्रम हा दि. ५/६/२०२२ रोजी प्रयासवन येथे सिडबॉल प्रशिक्षण कार्यशाळेत सहभाग नोंदवून करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन मुख्याधिकारी नगरपरिषद  सौ. मडावी या होत्या तर सिडबॉल प्रशिक्षक म्हणून सौ. अमृता खंडेराव या होत्या. त्यांनी विद्याथर्यांना सिड्सबॉल चे प्रशिक्षण देऊन प्रवास करतांना ते बॉल्स जंगलात दऱ्या खोऱ्यात फेकुन पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावण्याचा संदेश दिला. मुख्याधिकारी सौ. मडावी यांनी सर्व सामन्य जनतेला व विद्यार्थांना घन कचरा निर्मुलनासाठी प्रवृत्त करून घरच्या घरी घन कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे हे सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे एकुण १००० सिड्स बॉल्स तयार करून येणाऱ्या जुन-जुलै महिण्यामध्ये जंगल परिसरामध्ये फेकण्याचा संकल्प केला.
संपूर्ण कार्यक्रम हा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम व सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांच्या मागदर्शनात झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता साक्षी चव्हाण, रोहन गायकवाड, सृष्टी येडमे, नेहा पवार, प्रथमेश उमरे, निशांत मडावी, प्रार्थना इंगोले, रश्मी परसराम, निरज नेवारे यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज मध्ये पर्यावरण जनजागृती स्वच्छता सप्ताह

दिनांक 30/05/ 2022 ते 5/ 06 / 2022 या कालावधीत ‘पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत पर्यावरण जनजागृती स्वच्छता सप्ताहाचे उद्‌घाटन 31/05/2022 रोजी प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्‌घाटन कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना प्रास्ताविकातुन पर्यावरण संवर्धन म्हणजे काय व हा सप्ताह राबवण्या मागची भुमिका विस्तृत स्वरूपात कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी स्पष्ट करून सांगितली व पुढील सप्ताह भर परिसर स्वच्छ करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. आशालता आसुटकर यांनी विद्यार्थांना प्रदुषणामुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास हा चिंतेचा विषय आहे असे सांगुन “झाडे लावा झाडे जगवा” असा संदेश देवून समोरच्या कार्यासाठी प्रोत्साहन दिले.
सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थांना सप्ताह अंतर्गत करण्याच्या कामाची रुपरेषा सांगुन झाडे लावण्याचा व परिसर स्वच्छता करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी येडमे हिने केले तर आभार प्रदर्शन रोहन गायकवाड याने केले .
कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी साक्षी चव्हाण, कोमल काळे, मनिषा मोकासे, रश्मी परसराम, प्रार्थना इंगोले, खुशी नंदनवार, दादाजी किनकर, अवंतिका होलमाने यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज मध्ये पुस्तकांचे प्रदर्शन व पुस्तक दिन साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे दि. २३-४-२०२२ रोजी जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकांचे व दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले व कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्तविक करतांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व सांगून जगभरात तो कसा साजरा केला जातो हे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतांना ग्रंथालय प्रमुख श्री विजय दीक्षित यांनी पीपीटी द्वारे दाते कॉलेजच्या ग्रंथालयाची माहिती देऊन ग्रंथ कशाप्रकारे पाहायचे व विविध पुस्तके ऑनलाईन कशा पद्धतीने वाचायचे हे सविस्तर सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांनी पुस्तकाचे विद्यार्थी जीवनामध्ये असलेले महत्त्व सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी ई बुक कसे वाचायचे व विविध वेबसाईट ची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन गायकवाड ह्याने केले तर आभार प्रदर्शन खुशी नंदनवार हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ऋतुजा सोडगीर, अवंतिका होनमाने ,दादाजी  किनकर,  साक्षी चव्हाण, मनीषा मोकासे, प्रथमेश उमरे या यांनी परिश्रम घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि.१०/०४/२०२२ रोजी प्राचार्य  डॉ. कल्पना देशमुख यांच्या मार्गदर्शनात रॅलीचे (शोभा यात्रा) आयोजन करून जनजागृतीपर प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना  भारत सरकारच्या विविध शिष्यवृत्तींची माहिती देऊन शैक्षणिक प्रगती कशी साधावी याची माहिती दिली. त्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅली ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ गेल्या नंतर परिसर स्वच्छता करण्यात आली. शासकीय वसतिगृहे, शिष्यवृत्ती , रमाई आवास योजना , सबळीकरण, स्वाभिमान योजना व स्वाधार योजना यावर पथनाट्य व लघुनाटिकेतून जन जागृतीपर प्रबोधन करण्यात आले तसेच जागर गीत ,विविध घोषवाक्य , राष्ट्रीय सेवा योजना गीतातून जन प्रबोधन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

 

चापर्डा येथे दाते कॉलेज तर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसांचे विशेष शिबिर

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर दत्तक ग्राम चापर्डा येथे १९ मार्च ते २५ मार्च २०२२ दरम्यान संपन्न झाले.
दि. २५-३-२०२२ रोजी समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष श्री सतिश फाटक होते. त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना हे व्यक्तिमत्व घडविण्याचे व्यासपीठ आहे असे सांगून विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हा समन्वयक डॉ. रत्नदीप गंगाळे  यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा हेतू स्पष्ट करून सांगितला व जे विविध उपक्रम राबविले गेले त्याचे कौतुक केले. प्रमुख अतिथी म्हणून संबोधन करतांना संत गाडगे बाबा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. विवेक देशमुख यांनी विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून स्वतःच्या कला गुणांची माहिती होऊन पुढे व्यक्तिमत्व विकासात भर पडेल असे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांनी विद्यार्थ्यांना हे कलागुण असेच जोपासून शिबिरातून जे संस्कार मिळतील ते कायम ठेवून आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी असे सांगितले.
प्रस्तुत शिबिरामध्ये राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती प्रास्ताविकातून कार्यक्रम अधिकारी डॉ.वैशाली मेश्राम यांनी देतांना विद्यार्थ्यांनी श्रमदानातून  बंधारा उभारणे, ट्रॅकिंग, ग्रामस्थासाठी शोषखड्डे, वृक्षारोपण, इत्यादींची माहिती दिली.
शिबिराच्या काळात  पथनाटय, घोषवाक्य, स्फुर्ती गीते, जागर गीते व सांस्कृतिक कार्यक्रमातून ग्रामस्थांना विविध संदेश देण्यात आले. तसेच आरोग्य शिबिराद्वारे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या सिकलसेल, थायराइड, शुगर, बी.पी., एच.आय.व्ही., रक्तगट तपासणी करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलनाचे विविध प्रयोग ग्रामस्थांना दाखवून प्रबोधन करण्यात आले.
विविध बौद्धिक सत्रांद्वारे व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, जाऊ आनंदाच्या गावा, Career Options after Graduation, इत्यादी विषयांवर सविस्तर मागदर्शन करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी शिबीरास्थळी स्वतः स्वयंपाक करून सहभोजनाचा मनमुराद आनंद लुटला.
दि. २५-३-२०२२ च्या समारोपीय कार्यक्रमात विविध बक्षिसे देऊन सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. आभार प्रदर्शन करतांना डॉ. जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या विशेष कामाचा उल्लेख केला व समस्थ ग्रामस्थाचे सहकार्य असेच लाभो ही अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशांत मडावी ह्याने केले.
विविध कार्यक्रमामध्ये डॉ. ताराचंद कंठाळे , डॉ. सौ. स्नेहल डहाळे, श्री विनोद तलांडे, श्री हरिदास धुर्वे, श्री दत्तात्रय जोशी, डॉ. अमोल राऊत, डॉ. रविजीत गावंडे. डॉ. सचिन तेलखडे या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

चापर्डा येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिराचे उदघाटन

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नीत  राष्ट्रीय सेवा योजने द्वारा सात दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन चापर्डा येथे १९ ते २५ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. या शिबिरात ५० चे वर विद्यार्थांनी भाग घेतला आहे.
या शिबिराचे उदघाटन शनिवार दि.१९/३/२०२२ रोजी झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना देशमुख यांनी भूषवले. उदघाटन जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष मैनाताई उईके यांनी केले. त्यांनी विद्यार्थांना समाज  सेवा करणे हा राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश असुन विद्यार्थांनी त्यासाठी सतत प्रयत्नरत राहिले पाहिजे असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणातून रा.से.यो.  सेवकांनी या सात दिवसीय विशेष शिबिरामध्ये विविध उपक्रम कसे राबवायचे हे सांगितले.
जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जमदाळे यांनी सेवा भावाचा अर्थ स्पष्ट करून प्रत्येकाच्या अंगी हा सेवा भाव कसा रुजविता येईल हे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दादाजी किनकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैशाली मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन अवंतिका होनमाने हिने केले.

‘डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला विषयक कार्य' या विषयावर कार्य शाळा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला विषयक कार्य"  या विषयावर कार्यशाळा दि. १४/३/२०२२ रोजी संपन्न झाली.
महाविद्यालयातील तसेच  परिसरातील विविध महाविद्यालयामधून १३० विद्यार्थी सहभागी झाले होते.
उद्घाटक तथा प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन करताना लोकमान्य महाविद्यालय वणीच्या मा. डॉ. रेखा बडोदेकर  यांनी महिलांची आजची स्थिती विषद केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी महिलांसाठी केलेले कार्य कसे प्रेरणादायी आहे हे सविस्तर सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या ओवी ट्रस्टच्या संचालिका प्रणाली जाधव यांनी महिला विविध क्षेत्रात कशा यश प्राप्त करू शकतात व त्यांना   स्वयंरोजगाराच्या संधी देऊन कसे सक्षम करता येईल हे सांगितले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांनी जागतिक महिला दिन साजरी करण्या मागची भूमिका व स्त्रियांचे आजचे स्थान विस्तृत करून सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळा आयोजनामागची भूमिका स्पष्ट करून सांगितली. सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी राष्ट्रीय सेवा योजना आपल्या कार्यातून महिलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सतत पेरणा देत असते असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थांना प्रमाणपत्रे वाटण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाजी किनकर यांनी तर आभार प्रदर्शन अवंतिका होलमाने हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नेहा पवार, साक्षी चव्हाण, रश्मी परसराम, प्रार्थना इंगोले, कोमल काळे, ऋतुजा सोडगीर, योगिता सहारे, जानवी उरकुडे, गायत्री खरकाटे यांनी परिश्रम घेतले.

सावित्रीबाई फुले स्मृती दिन साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिना निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांच्या मार्गदर्शनात दि. १०/३/२०२२ रोजी करण्यात आले.
प्रस्तुत कार्यक्रमाकरिता महिला शिवण वर्गाच्या प्रशिक्षिका स्वाती चव्हाण ह्या प्रमुख अतिथी होत्या. त्यांनी महिला आज कशा सक्षम झाल्या व त्यांचे कर्तृत्व सातासमुद्रा पलीकडे कसे गेले हे सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी सावित्रीबाईंच्या विचारांची आज खरी गरज असून प्रत्येक महिला ही सक्षम बनली पाहिजे व स्वतःच्या अस्तिवाची जाणीव झाली पाहिजे व यासाठी रोजगार एक माध्यम आहे असे मत व्यक्त केले.
प्रार्थना इंगोले, योगेश्वरी ढगे, साक्षी चव्हाण, रशमि परसराम, ह्यांनी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्र संचलन अवंतिका होलमाने हिने तर आभार प्रदर्शन योगिता साहारे हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नेहा पवार, निशांत मडावी, दादाजी किनकर, ऋतुजा सोडगिर, ह्यांनी परिश्रम घेतले.

जागतिक महिला दिन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे दि. ८/३/२०२२ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक महिला दिन आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रम अधिकारी डॉ.वैशाली मेश्राम  यांनी जागतिक महिला दिनाची  पार्श्वभूमी सांगून महिलांना कर्तुत्ववान व सक्षम करण्यासाठी जागतिक महिला दिन एक विशेष भूमिका बजावते तसेच आपआपल्या क्षेत्रात कर्तुत्व सिद्ध केलेल्या महिलांचा गौरव करण्याचा हक्काचा दिवस म्हणून जागतिक महिला दिन जगभरात साजरा केला जातो असे  सांगितले. प्रमुख वक्त्या व अतिथी म्हणून मंचावर उपस्थित असलेल्या उपजिल्हाधिकारी डॉ.स्नेहल कानिंचे ह्यांनी स्त्रिया ह्या कर्तृत्ववान आहेत व उच्च स्थानी विराजमान असून त्यांची भूमिका ही सर्व क्षेत्रात उज्वल आहे असे सांगितले, स्पर्धा परीक्षेतून उतुंग भरारी कशी घेता येईल हे सांगून MPSC स्पर्धा परीक्षेसंबंधी मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते ह्यांनी सांगितले की महिला ‘दीन’ होत्या म्हणून ‘महिला दिन’ साजरा करण्याची वेळ आली होती. परंतु आता महिला सक्षम होत आहेत त्यामुळे लवकरच ‘महिला दिन’ साजरा करण्याची आवश्यकता भासणार नाही. अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.कल्पना देशमुख ह्यांनी महिला  ह्या विश्वाच्या  सृजनकर्त्या असून त्याचे क्षेत्र विशाल व भव्य आहे असे सांगून महिलांच्या कर्तुत्वावर प्रकाश टाकला.  या कार्यक्रमामध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ताराचंद कंठाळे ह्यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.सचिन जयस्वाल ह्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दादाजी किनकर, साक्षी चव्हाण, निशांत मडावी, कोमल काळे, रश्मी परसराम, अवंतिका होनमाने, जुई काळे, योगिता सहारे, जानव्ही उरकुडे, प्रार्थना इंगोले, सौरव जाधव, ऋतुजा सोडगीर, गायत्री खरकाटे ह्यांनी परिश्रम घेतले.

 

दाते कॉलेज मध्ये संत गाडगेबाबा जयंती साजरी

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत संत गाडगेबाबा जयंती दि. २३/२/२०२२ रोजी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी  विभागाच्या प्रा.डॉ आशालता आसुटकर होत्या. त्यांनी विद्यार्थांना गाडगे बाबानी जी सेवावृती जोपासली ती प्रत्येक विद्यार्थ्यांने जोपासून जनसेवेचा वसा घ्यावा असे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. वैशाली मेश्राम यांनी स्वच्छ्ता व गाडगेबाबा यांचा सहसबंध समजून देत कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे हे सांगितले. सहकार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ सचिन जयस्वाल ह्यांनी विद्यार्थ्यांना गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रबोधन केले हे सांगत  विविध उदाहरणे दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवंती होलगरे हिने तर आभारप्रदर्शन कोमल काळे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता  सौरव जाधव, राहुल लसवंते, दिशा आडे, नेहा नागरिकर, दिशा काळसरपे, जुई काळे, यांनी परिश्रम घेतले.

जिल्हा स्तरीय युवा सांसद स्पर्धेत सुयश

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी दादाजी नियोजीत किनकर ह्यांनी दी.१९/२/२०२२ रोजी ऑनलाईन  घेतलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतर्गत आयोजित युवा सांसद मध्ये “अतुल्य भारत” या विषयावर आपले विचार व्यक्त केले.

यामध्ये भारतीय संस्कृती नितीमुल्यांची ओळख हा विषय मांडून पुढील फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले.

त्याने मिळवलेल्या यशाबद्दल कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल व सर्व प्राध्यापक वृदांनी कौतुक केले.

दाते कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना नेहरू युवा केंद्रातर्फे मार्गदर्शन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र यवतमाळ, महाराष्ट्र शासनाच्या वतीने युवकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दि. १६/२/२०२२ रोजी करण्यात आले.
यूथ ओरिएनटेशन प्रोग्राम मधे युवकांचे मानसिंक स्वास्थ्य, एड्स जागरूकता व बेटी बाचाओ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
नेहरू युवा केंद्राचे अधिकारी श्री. अनिल ढेंगे यांनी नेहरू युवा केंद्राची भुमिका स्पष्ट करून खेड्यात युवा गटा द्वारे रोजगाराच्या संधी यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले श्री. सौदागर सर यांनी मानसिक आरोग्य म्हणजे काय व ते चांगले राखण्यासाठीची भूमिका स्पष्ट केली. आरोग्य विभागाच्या दास मॅडम यांनी  ऐड्स विषयी माहिती देऊन समज, गैरसमज स्पष्ट करून सांगितले.  सौ पूनम यांनी गर्भलिंग  परीक्षण करणे कसे चुकीचे आहे व केल्यास काय शिक्षा होऊ शकते हे सांगितले.
राष्ट्रिय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ.वैशाली मेश्राम ह्यांनी युवा वर्ग या सर्व कार्यात कशी भूमिका बजावतो हे सांगून राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सर्व उपक्रमामध्ये युवा केंद्रा सोबत सक्रिय सहभाग नोंदवतील अशी ग्वाही दिली. राष्ट्रिय सेवा योजनेचे सहकार्यक्रम  अधिकारी डॉ.सचिन जयस्वाल यांनी युवकांना विविध रोजगार संधी नेहरू युवा केंद्रा मार्फत कशा उपलब्ध होतील हे सविस्तर सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन शुभम राऊत याने तर आभारप्रदर्शन  गौरव जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अजय मांडवकर, सुरक्षा गेडाम, कल्याणी राऊत, चैताली मराठे, स्न्हेल कणाके व पल्लवी आत्राम यांनी परिश्रम घेतले.

लसीकरण शिबिराचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे, राष्ट्रीय सेवा योजना व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दी.२७/१/२०२२ ते २८/१/२०२२ असे २ दिवस १५ ते २५ वयो गटासाठी लसीकरण  शिबिर आयोजित करण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी लसीकरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले तर सहकार्यक्रम अधिकारी डॉ.जयस्वाल ह्यांनी लसीकरणाचे फायदे सांगून लस घेण्याचे आव्हान केले.

कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.पंचभाई ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थी लसीकरणाला येतील यांची व्यवस्था करून लसीकरण कोविड पासून वाचण्याचे कसे सुरक्षा कवच आहे हे सांगितले.

जिल्हा परिषद आरोग्य विभागा तर्फे डॉ. शिवराज दरारे, नर्स दिक्षा डंभारे, व मेरी कोरील, प्रोजेक्ट कॉरडीनेटर संदिप घोडे या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले  तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या निशांत मडावी, कोमल काळे, मनीषा मोकाशे, खुशी नंदनवार, साक्षी चव्हाण, रश्मी परसराम, कुणाल बेंद्रे ह्यांनी सहकार्य केले.

लसीकरण शिबिराचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे, राष्ट्रीय सेवा योजना व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दी.२७/१/२०२२ ते २८/१/२०२२ असे २ दिवस १५ ते २५ वयो गटासाठी लसीकरण  शिबिर आयोजित करण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी लसीकरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले तर सहकार्यक्रम अधिकारी डॉ.जयस्वाल ह्यांनी लसीकरणाचे फायदे सांगून लस घेण्याचे आव्हान केले.

कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.पंचभाई ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थी लसीकरणाला येतील यांची व्यवस्था करून लसीकरण कोविड पासून वाचण्याचे कसे सुरक्षा कवच आहे हे सांगितले.

जिल्हा परिषद आरोग्य विभागा तर्फे डॉ. शिवराज दरारे, नर्स दिक्षा डंभारे, व मेरी कोरील, प्रोजेक्ट कॉरडीनेटर संदिप घोडे या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले  तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या निशांत मडावी, कोमल काळे, मनीषा मोकाशे, खुशी नंदनवार, साक्षी चव्हाण, रश्मी परसराम, कुणाल बेंद्रे ह्यांनी सहकार्य केले.

मतदान दिना निमित्त जिल्हा स्तरिय ई-घोषवाक्य व इ-निबंध स्पर्धा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत जिल्हास्तरीय ई-घोषवाक्य स्पर्धा व इ-निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना “मी जागरूक मतदाता” व “मी मतदार - सशक्त व सुरक्षित" हे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते. दि 22 जानेवारी ते 24 जानेवारी २०२२ चे दरम्यान WhatsApp  वर  इ-घोषवाक्य व इ-निबंध मागविले होते.

गुणानुक्रमे प्रथम क्रमांक दादाजी किनंकर,  द्वितीय क्रमांक साक्षी चव्हाण व तृतीय क्रमांक रश्मी परसराम यांना प्राप्त झाला. प्रथम आलेल्या दादाजी किनंकर ह्याचा जिल्हाधिकारी श्री अमोल येडमे ह्यांच्या हस्ते गौरव करून त्याला सन्मान पत्र देण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी  कार्यालयात दि. २५-१-२०२२ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अवंती होलमाणे, रश्मी परसराम, निशांत मडावी, कोमल काळे, खुशी निंदणवार, साक्षी चव्हाण ह्यांनी सहकार्य केले.

दाते कॉलेजमध्ये रासोयो व राज्यशास्त्र विभागातर्फे "राष्ट्रीय मतदान दिन" साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दी. २२/१/२०२२ रोजी “मतदार दिन" आयोजित करण्यात आला. "मी माझे मत विकणार नाही” ह्या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १० स्पर्धकांनी यात भाग घेतला. गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

कार्यक्रमाला संबोधित  करतांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही मध्ये निवडणुकीचे महत्व व मतदारांची भूमिका स्पष्ट करून सांगितली. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन जयस्वाल ह्यांनी योग्य व सक्षम लोकप्रतिनिधीं निवडण्याची जबाबदारी मतदारावर आहे, म्हणुन कुठल्याही प्रलोभनाला  बळी न पडता निर्भय निःपक्ष मतदान करावे असे सांगितले, विद्यार्थ्यांनी शपथ ग्रहण केल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरता  अवंती होलमाने, साक्षी चव्हाण, नेहा पवार, रश्मी परसराम, निशांत मडावी, खुशी नंदनवार, अक्षय किनकर, कोमल काळे व प्रार्थना इंगोले यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ, राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली.
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा यवतमाळ, राष्ट्रीय सेवा योजना, स्कूल ऑफ स्कॉलर तसेच बालाजी स्पोर्टस अकाडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२/१/२०२२ हा युवा दिन म्हणुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला.
विवेकानंद केंद्राचे श्री. सुरेंद्र नार्लावार यांनी प्रास्ताविकातून केंदाची भुमिका तसेच कार्यक्रम आयोजनाचा हेतू युवा वर्गाला सविस्तर सांगितला. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. अमोलजी गठीकर यांनी विवेकानंदांनी तसेच जिजाऊनी जिजाबाईंनी संस्कार कशाप्रकारे दिले व या संस्काराची शिदोरी आपण कशा प्रकारे समोर घेऊन गेलो पाहिजे हे उदाहरणासहित स्पष्ट केले.
आभार प्रदर्शन करतांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विवेकानंदांच्या विचाराची  आज खरी गरज असून केंद्रा अशा उपक्रमात  NSS युनिट सदैव सहकार्य करेल अशी ग्वाही दिली, व सर्व आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता  राष्ट्रीय सेवा योजनेचे सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल, यवतमाळ शाखेचे युवा प्रमुख अभिजित पवार, दादाजी किणकर, कुणाल बेंद्रे, नेहा पवार, राधा जाधव, रशमी परसराम, साक्षी चव्हाण, यांनी सहकार्य केले.

सिंधुताई सकपाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ, येथील राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत  दिनांक ५/०१/२०२२ रोजी संविधान चौक येथे अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ.वेशाली मेश्राम यांनी सिंधुताईच्या जीवनपटावर प्रकाश टाकून त्याच्या समाज कार्याचे अनुकरण सर्व समाजाचे करणे गरजेचे आहे असे सांगितले. सहकार्यक्रम अधिकारी सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना सिंधुताई समाजासाठी अनाथासाठी कशाप्रकारे माय झाल्या हे सांगितले.
अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुनयना यवतकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ नगर परिषदच्या CEO माधुरी मडावी ह्या  उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादाजी किणकर, प्रार्थना इंगोले, नेहा पवार, निशांत मडावी, रश्मी परसराम, आशिष बेंद्रे, प्रज्वल मेश्राम, व साक्षी चव्हाण ह्यांनी परिश्रम घेतले.

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दाते कॉलेज तर्फे पारधी बेड्यावर शैक्षणिक साहित्याचे वाटप

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे दिनांक ०३/०१/२०२२ रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला मालार्पण करून पारधी बेडा येथे स्वच्छता व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी खेड्यावरील लोकांना शिक्षण हें जीवनाचा अविभाज्य भाग असून शिक्षण घेतल्याने तुम्ही आणि तुमचे मुले, चांगले जीवन जगून मुख्य प्रवाहात येवू शकता  असे आवाहन केले.  सहकार्यक्रम अधिकारी डॉ.सचिन जयस्वाल यांनी मुलींना शाळेत पाठवणे किती गरजेचे आहे हे सांगितले व स्वच्छता आणि आरोग्य यांचा संबंध समजून शाळेत जाण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी सर्वांशी संवाद साधून लहान मुलांना आणि वृद्धांना फलाहार देवून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कुणाल बेदरे, निशांत मडावी, दादाजी किनकर, प्रार्थना इंगोले, दिव्या डोमे, रश्मी परसराम, खुशी नंदनवार, अवंती होलमाणे, ऋतूजा सोडगिर, प्रनोती हसतबांधे, साक्षी चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज तर्फे नववर्षा निमित्त गरजूंना अन्न किटचे वाटप

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य  महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या अंतर्गत नववर्ष  निमित्त दि. १-१-२०२२ रोजी  शहरातील विविध गरजू व्यक्तींना मिठाई  व खाद्य पदार्थांचे  वाटप प्राचार्य वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनिंना अन्न दानाचे महत्त्व विषद केले व सेवा हा राष्ट्रीय सेवा योजनेचा मुलमंत्र आहे असे सांगितले. सहकार्यक्रम अधिकारी डॉ सचिन जयस्वाल ह्यांनी मानवता हाच एक धर्म असून विद्यार्थ्यांनी तो जोपासला पाहिजे असे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता निशांत मडावी, कुणाल बेंदे, रश्मी परसकर, दिव्या डोमे, प्रार्थना इंगोले, प्रणौती हसातबांधे, खुशी नंदनवार, साक्षी चव्हाण,  ह्यांनी परिश्रम घेतले.

‘संविधान धर्म संसद आणि कायद्याचे राज्य’ या विषयावर वेबिनार

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग तसेच व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर व संविधान जागरूकता मंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान धर्म संसद आणि कायद्याचे राज्य’ या विषयावर दि. २८-१२-२०२१ रोजी वेबिनार चे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते श्री असीम सरोदे यांनी आपल्या व्याख्यानातून मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, संविधानिक मूल्य, धर्मसंसद आणि कायद्याचे राज्य यावर विस्तृत विचार मांडले, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुळकर्णी यांनी आपल्या मनोगतातून संविधानाचे महत्व सांगितले आणि असे वेबिनार वारंवार आयोजित केल्या गेले पाहिजेत असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैशाली वराडे हिने केले. आभार वसंत मनुरे यांनी मानले. कार्यक्रमाला 37 विद्यार्थी उपस्थिती होते.

दाते कॉलेज मध्ये ‘संविधानिक मूल्ये’ यावर संवाद

बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय येथे दिनांक २३/१२/२०२१ गुरुवार रोजी राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद संविधानाचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
प्रमुख वक्ते राजवैभव रामचंद्र हे कोल्हापुर येथून खास संविधानाचा संवाद विद्यार्थ्यांशी साधण्यासाठी आले होते. त्यांनी ‘संविधानिक मूल्ये’  भारुडातून व थेट संवाद साधून लोकभाषेत समजून सांगितली. ओवी ट्रस्ट च्या प्रणाली जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक सेवेतून संविधानिक मूल्ये कशी जोपासली जातील हे विद्यार्थ्यांना सांगितले.
सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.सचिन जयस्वाल यांनी संविधान राज्यशास्त्राचा कसा अविभाज्य भाग आहे हे सांगून संविधानिक  मूल्ये कशी जोपासली जातील हे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. वैशाली मेश्राम यांनी ओवी ट्रस्ट सोबत सामाजिक बांधिलकी म्हणून लहान मुलांच्या शिक्षणात राष्ट्रीय सेवा योजना सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाजी किनकर तर आभार प्रदर्शन निशांत मडावी यांनी केले. मनीषा मोकाशे, अवंतिका होनमाने, गायत्री खरकटे,जान्हवी उरकूडे, प्रज्वल मेश्राम यांनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज मध्ये संत गाडगेबाबा स्मृती दिनानिमित्त स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे दिनांक २०/१२/२०२१ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन प्राचार्य डॉ.वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून राष्ट्रीय योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी स्वच्छतेचे महत्व भुकेल्याला अन्न, तहानलेल्याना पाणी आणि अंधश्रद्धेची काजळी दुर करून डोळस श्रध्दा वाढवण्यासाठी संत गाडगेबाबा झटले तसे आपण समाजसेवक म्हणून झटले पाहिजे असे उद्बोधन रॅलीला केले. सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी अज्ञान अस्वच्छता अंधश्रद्धा यांना दूर ठेवून समाज सुधारण्याचे व्रत हाती घ्यावे असे आव्हाहन केले. या निमित्ताने एक रॅली काढण्यात आली
विद्यार्थ्यांनी घोषणा आणि  नारे देउन नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. रस्ते व परिसर स्वच्छ केला तसेच महाविद्यालय व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कुणाल बेंद्रे, साक्षी चव्हाण, प्रायना इंगोले, साई अडवलवार, महेश विरदंडे, यश मार्कंड  यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज मधे एक दिवसीय पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे १० डिसेंबर २०२१ रोजी एक दिवसीय पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन गृह अर्थशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी होत्या. अध्यक्षीय भाषणात सौन्दर्य निर्मितीसाठी पुष्परचना कशी महत्वाची आहे यावर प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.  गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी महाविद्यालयात कार्यक्रमासाठी बुके आणि हार लागतात त्यावर विद्यार्थ्यांनी बनविलेले बुके वापरून वर्षभराचा खर्च कसा वाचवता येईल, तसेच टाकावू सामानांपासून सुंदर पुष्परचना कशा तयार करता येतील हे प्रशिक्षणाद्वारे शिकविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालय गृहअर्थशास्त्रच्या प्रा. सारिका नंदे उपस्थित होत्या.  कु. प्रणाली अगलधरे यांनी पुष्परचना आणि बुके विकून स्वयंरोजगार कसा करता येईल याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे आयोजक व मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रश्मी परसराम, दिव्या भगत, साक्षी चव्हाण, कोमल काळे, स्नेहल किनाके यांनी परिश्रम घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन :-

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संचालित द्वारा संचलित बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त ६ डिसेंबर २०२१ रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल होते तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाने दिलेलं हक्क, मूलभूत अधिकार, स्त्रीसशक्ती करणं, आणि राष्ट्रीय सेवा योजनेत त्यांची भूमिका विशद केली राष्ट्र विकासासाठी युवा शक्तीचे असलेले महत्व या विषयावर प्रतिपादन केले. तर अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनाराष्ट्रीयसेवा योजनेमार्फत विविध कलागुण कसे जोपासता येतील आपल्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या गोष्टी पूरक आहेत, सामाजिक जीवनात आणि विद्यार्थी जीवनात काय भूमिका असावी, विद्यार्थ्यांनी स्वतःला कस घडवाव आणि त्याचा उपयोग राष्ट्रहितासाठीच कसा करता येईल यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला यशस्वी पार पाडण्यासाठी कोमल काळे, दिशा आडे, सृष्टी येडमे, निलेश चव्हाण, तसेच उमेश काळे यांनी परिश्रम घेतले

संविधान दिन साजरा

26 नोव्हेंबर 2021 रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ वैशाली मेश्राम तर प्रमुख वक्ते डॉ सचिन जयस्वाल होते सर्वप्रथम उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की संविधान प्रत्येक विद्यार्थ्यांने वाचले पाहिजे संविधान जाणून घेणे प्रत्यकाचे कर्तव्य आहे भारतीय संविधान निर्मिती कार्य होऊन आज 72 वर्षे झाली तरीही जनतेमध्ये संविधाना बद्दल जाणीव आणि जागृती नाही  ही जाणीव जागृती होणे गरजेचे आहे सोबतच संविधानात कोणत्या तरतुदी आहे आपले अधिकार व कर्तव्य या संदर्भात आढावा घेऊन संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले
प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा स्मिता देशमुख व प्रा वैशाली सोनकुसरे होते कार्यक्रमा च्या यशस्वीते साठी कु रश्मी परशराम ,प्रार्थना इंगोले ,कल्याणी कुडमते, रोहन गायकवाड,रोशन पारधी यांनी परिश्रम घेतले

नागरिकांना रक्तदानाचे आवाहन

महाराष्ट्र शासनाच्या  आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तेव्हा राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत नागरिकांना रक्तदान करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. महाविद्यालयाच्या वतीने कॉलेज प्रांगणात तसेच बस स्टँड वर दर्शनीय ठिकाणी अशाप्रकारचे  बॅनर लागले आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर - महापरिनिर्वाण दिन
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ६ डिसेंबर २०२०, महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करताना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे

संविधान एक आदर्श आचारसंहिता -प्रा.डॉ.गजानन हेरोळे

दिनांक 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय  राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत संविधान दिवस आभासी पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रा. डॉ.गजानन हेरोळे व मराठी विभाग प्रमुख कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय, दर्यापूर हे प्रमुख मार्गदर्शक तर अध्यक्ष कार्यकारी प्राचार्य डॉ प्रदीप दरवरे होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय इतिहास वाचून प्रेरणा घ्यावी. भारतीय संविधान एक आदर्श आचारसंहिता आहे तिचे पालन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ. हेरोळे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दरवरे म्हणाले की भारत हा बहुधर्मीय देश असून केवळ संविधानाने एका सूत्रात बांधल्या गेला आहे. सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथांचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन  व आभारप्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ताराचंद कंठाळे  यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्य रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा

दिनांक ११ नोव्हेंबर 2020 रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिवस अर्थात भारताचे प्रथम शिक्षण मंत्री डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत  साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रदीप दरवरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून यवतमाळ येथील सुप्रसिध्द वऱ्हाडी कवी श्री जयंत चावरे उपस्थित होते. डॉ. मौलाना आझाद यांचा देशाच्या विकासात आणि शिक्षण क्षेत्रात मोठा सहभाग असून त्यांनी भारतीय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र परिवर्तन केले. तसेच त्यांनी विश्व विद्यालय अनुदान आयोग स्थापन करण्यात मोठी कामगिरी बजावली असे प्रतिपादन श्री जयंत चावरे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रदीप दरवरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयम् सेवकांनी डॉ. मौलाना आझाद यांच्या विचारांचा अंगीकार करून सदैव मानवता जोपासण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन केले. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा डॉ. ताराचंद  कंठाळे यांनी केलें. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

वाचन प्रेरणा दिन - १५ ऑक्टोबर २०२०

आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२०ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती विज्ञानऋषि डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्रम आभासी पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रदीप दरवरे तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ.हरिदास आखरे, मराठी विभाग, श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय, दर्यापूर होते.
डॉ.कलामांनी भारतीय युवकांमध्ये स्वप्न पेरण्याचे काम करून देशाला महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न केला. विज्ञान क्षेत्रात  त्यांनी केलेली प्रगती विस्मयकारक आहे. गरिबीचा सामना करत अनेक उच्च पदे भूषविली परंतु सदैव देशसेवा म्हणजेच विज्ञान सेवा हा मंत्र संपूर्ण जीवनभर अंगिकारला. त्यांची सर्वच पुस्तके ऊर्जा प्रदान करतात आणि नेहमी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत राहतील. त्यांची जयंती ही सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. युवकांनी ग्रंथालयांना नित्य भेट द्यावी. आज ग्रंथालये ओस पडत असून पुस्तके टाहो फोडीत आहेत.  वाचन दिनानिमित्त वाचनाचा  ध्यास घेऊन सार्वांनी आपले व्यक्तिमत्त्व उदात्त उज्वल बनवावे असे प्रतिपादन डॉ. आखरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ दरवरे यांनी आपल्या मनोगतातून स्वयंसेवकांनी मनोरंजना सोबतच ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. युवक या देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी डॉ. कलामांच्या जीवनातून काही आदर्श घेऊन वाचन सवय अंगिकारावी असे मनोगत व्यक्त केले. कोणतीही शाखा ही कमी महत्त्वाची असत नाही कारण देशातील सर्वोत्तम डोके हे सर्वात शेवटच्या बाकावर सापडते, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना दिला.
सुरुवातीला डॉ.कलाम, संस्थापक बाबाजी दाते आणि कर्मयोगी गाडगे बाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन, प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय  आणि आभार प्रदर्शन कार्यक्रम  अधिकारी प्रा.डॉ. ताराचंद कंठाळे  यांनी मानले. या वाचन प्रेरणा दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमात सर्व प्राध्यापक वर्ग आणि बहुसंख्य विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

२ ऑक्टोबर- महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

दिनांक २ ऑक्टोबर २०२० ला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती चे औचित्य साधून बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय तथा जाजू कॉलेज यांचे संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य चांडक तर प्रमुख वक्ते कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. ताराचंद कंठाळे होते.
सुरुवातीला गांधीजी आणि शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.योगेश पाटील यांनी केले. महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य वाहून सत्य, अहिंसा या मूल्यांची जोपासना केली. आपल्या हातून घडलेल्या चुकांची कबुली देणारा  एकमेव महात्मा  म्हणजे गांधीजी. लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात सुचीर्भुत राजकारण केले. तसेच जय जवान जय किसान हा महामंत्र देऊन देशाचा पोशिंदा शेतकरी आणि सीमांचे संरक्षण करणारे जवान यांना मानवंदना दिली. या दोन्ही महापुरुषाचे जीवन आदर्शवत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात त्यांचे आदर्श जोपासण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन मार्गदर्शक डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले. त्यानंतर प्रा.शिंगरवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी खरा तो एकची धर्म या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

“संवेदना आणि सहवेदना राष्ट्रीय सेवा योजना शिकविते” प्रा. डॉ.कल्पना देशमुख

२४ सप्टेंबर २०२० रोजी स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला श्रद्धेय बाबाजी दाते आणि कर्मयोगी गाडगे बाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी प्राचार्य डॉ.प्रदीप दरवरे, विशेष उपस्थिती म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष श्री विनायक दाते तर प्रमुख मार्गदर्शक भूगोल विभाग प्रमुख तथा विश्वस्त प्रा.डॉ. कल्पना देशमुख होत्या.
२४ सप्टेंबर १९६९ हा संपूर्ण भारतात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो. गाडगे बाबा यांची दशसुत्री लक्षात घेऊन समाजात वावरत असताना संवेदना आणि सहवेदना सदैव जीवंत ठेवणे गरजेचे आहे आणि हे शिकविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना व्यासपीठ करते असे प्रतिपादन डॉ.देशमुख यांनी केले. स्वयंसेवकांनी नेहमी सजग राहून देश, आई-वडील आणि समाजाप्रती कृतज्ञता बाळगावी असे मनोगत संस्थाध्यक्ष श्री विनायक दाते यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना हा महाविद्यालयांचा महत्त्वाचा घटक असून विद्यार्थ्यांनी सेवाभाव जोपासून  राष्ट्रीय आपत्ती, रक्तदान शिबिर,पल्स पोलिओ अशा प्रकारच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होत राहावे जेणेकरून उपक्रमशीलता आपणास शिकता येईल, तसेच आपले मन, मन गट आणि मेंदू  विधायक कार्यासाठी वापरावा असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दरवरे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक रासे यो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ताराचंद कंठाळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.अमोल राऊत यांनी केले. या कार्यक्रमाला इंग्रजी विभाग प्रमुख तथा विश्वस्त प्रा. डॉ.विवेक देशमुख, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आशालता आसुटकर,प्रा.डॉ.प्रशांत बागडे,प्रा.दत्तात्रय जोशी,प्रा. डॉ.स्नेहल डहाळे,प्रा. डॉ. मंजुश्री नेव्हल,प्रा.डॉ.सचिन जयस्वाल आणि बहुसंख्य रा सेयों  विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

पर्यावरण पूरक गणेश विसर्जन

दिनांक १ सप्टेंबर ला अनंत चतुर्दशी निमित्त प्रयास संस्थेच्या वतीने आयोजित पर्यावरण पूरक गणेश विसर्जन प्रयास वनात करण्यात आले. विसर्जना साठी मोठमोठे तळे करण्यात आले होते जेणेकरून मूर्तींची अवहेलना होणार नाही. या स्तुत्य उपक्रमात बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी दिवसभर सेवा दिली तसेच विद्यार्थ्यांना प्रयासचे वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ. विजय कावलकर, विजय देशपांडे, प्रशांत बनगीनवार या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. हा एक यवतमाळ शहरातील आदर्श उपक्रम असून सर्वत्र कौतुक होत आहे.

व्यक्तिमत्त्व विकास ह्यावर ऑनलाईन वेबिनार

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, अमोलकचंद महाविद्यालय आणि श्रीमती नानकीबाई  वाधवाणी महाविद्यालय यवतमाळ या महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट आणि  Stentorian Skill Development Academy, Mumbai यांच्या संयुक्त विद्यमाने ' Personality Development ' या विषयावर ९ ऑगस्ट २०२० क्रांती दिनी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारमध्ये वरील तीनही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. वेबिनारासाठी प्रमुख मार्गदर्शक Stentorian Skill चे प्रमुख श्री महेश सावळे सर हे होते. या वेबिनारच्या आयोजनात प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे ( रासेयो कार्यक्रम अधिकारी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय ) प्रा. डॉ. अनंत सूर्यकार ( रासेयो कार्यक्रम अधिकारी अमोलकचंद महाविद्यालय ) प्रा. डॉ. संजय राचलवार ( रासेयों कार्यक्रम अधिकारी श्रीमती नानकिबाई वाधवाणी महाविद्यालय ) यांचा होता. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना बौद्धिक खाद्य मिळावे या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन आहे असे प्रा. कंठाळे यांनी सांगितले.
श्री महेश सावळे सर यांनी Personality Development या विषयावर विद्यार्थ्यांना  सुरेख मार्गदर्शन केले. या जगात जीवन जगत असताना स्वतःचे व्यक्तिमत्त्व हे नेहमी उंचावण्याचा प्रयत्न करावा आणि वक्तृत्व शैली मध्ये बदल करून इतरांना आपल्याकडे आकर्षित करता येऊ शकते, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. प्रा. डॉ. संजय राचलवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले आणि प्रा. डॉ. अनंत सूर्यकार यांनी सर्वांचे आभार मानले.

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रायोपवेषण दिन संपन्न

दिनांक २६ फेब्रुवारी २०२० ला महान देशभक्त, स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी अर्थात प्रायोपवेषण दिवस बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.ताराचंद कंठाळे, कार्यक्रम अधिकारी तर प्रमुख मार्गदर्शक प्रा.अमोल राऊत होते. तसेच प्रमुख  उपस्थिती प्रा.सचिन तेलखडे होते.

हा देश अनेक समाजसेवक, समाजसुधारक, देशभक्त आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान केल्यामुळेच  स्वतंत्र झाला आहे. त्यापैकी सावरकर हे क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते असे प्रतिपादन प्रा.राऊत यांनी केले. दोन वेळा जन्मठेप मिळणारा हा देशभक्त जगात विरळाच असावा हा विचार त्यांनी मांडला. अध्यक्ष डॉ. कंठाळे यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकर घराण्याच्या तीन पिढ्या अर्थात विनायक सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर तसेच लहान बंधू डॉ.नारायण सावरकर यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्य यज्ञात आपल्या प्राणाच्या समिधा अर्पण केल्या आहेत. ते एक उच्च दर्जाचे कवी, लेखक, वक्ता तसेच मराठीचे उत्तम जाणकार होते. त्यांनी “कमला”, “माझी जन्मठेप”, ”१८५७ चे स्वातंत्र्य समर”, इत्यादी साहित्य लिहून अनेक अजरामर देशभक्ती पर गीते रचलीत. सुरुवातीला त्यांच्या.प्रतिमेला हारार्पण करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शेवटी डॉ. कंठाळे यांनी “ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला” या गीताने  समारोप केला.

गाडगे बाबा जयंती साजरी

२४-२-२०२० रोजी स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे स्वच्छता तपस्वी विदर्भाचे दीपस्तंभ, विदर्भ केसरी, वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांची जयंती  राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे तर प्रमुख वक्ता प्रा. डॉ.राजेश आदे, मराठी विभा ग प्रमुख, इंदिरा महाविद्यालय, कळंब उपस्थित होते.

संत गाडगे बाबांचे संपूर्ण आयुष्य हे स्वच्छता व समाज सुधारणेसाठी खर्ची झाले. समाजातील अनेक कुप्रथांवर त्यांनी प्रबोधनाच्या व कीर्तनाच्या माध्यमातून आसूड ओढलेत. तसेच रंजल्या  गांजल्या साठी धर्मशाळा, दवाखाने, गोरक्षण बांधले. परंतु आपल्या घराण्यातील एकही व्यक्ती  त्या संस्थांवर नियुक्त केला नाही हे फक्त असामान्य माणसेच करू शकतात, असे प्रतिपादन  डॉ. आदे यांनी केले. अध्यक्ष डॉ.मेहरे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या चरित्रातून चांगल्या गोष्टींचे अनुकरण करावे व केवळ  स्वतःसाठी न  जगता समाजासाठी जगता आले पाहिजे असा मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ताराचंद कंठाळे यांनी, संचलन हर्षदा चव्हाण तर आभार कु. पायघडे हिने मानले. सुरुवातीला दिप्रजवलान करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

महात्मा गांधी पुणयतिथी

30 जानेवारी २०२० रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महात्मा गांधी पुणयतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अमोल राऊत तर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. हरिदास  धूर्वें तसेच नगर परिषद येथील श्री पातोडे साहेब उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. देशाच्या इतिहासात रक्त न सांडता स्वातंत्र्य प्राप्त करून देणारा अवलिया म्हणजे गांधीजी असे विचार डॉ. धूरवे यांनी व्यक्त केले. तसेच महात्मा गांधी हे सत्य अहिंसा पाळणारे उत्तुंग  व्यक्तिमत्व होते असे अध्यक्षीय भाषणात श्री राऊत म्हणाले. या प्रसंगी प्रास्ताविक व संचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. ताराचंद कंठाळे यांनी तर आभार पायल किनाके यांनी मानले.

 

राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावते -शिबिराचा समारोप

शिबिराचा समारोप दिनांक ५ जानेवारी २०२० ला दत्तक ग्राम पांढरी येथे संपन्न  झाला. या समारोपीय सत्राच्या अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे तर प्रमुख उपस्थिती म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे उपाध्यक्ष श्री सतीश फाटक, सौ.शर्मिला फाटक, श्री विजय कासलीकर प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनेपासून राष्ट्राच्या उभारणीत तरुणांचा सहभाग राहिला आहे. राष्ट्र आणि युवकांमध्ये दुवा म्हणून राष्ट्रीय सेवा योजना काम करते. तर युवकांच्या सुप्त गुणांना अभिव्यक्त होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक आदर्श व्यासपीठ आहे असे प्रतिपादन श्री सतीश फाटक यांनी केले.
तत्पूर्वी सात दिवसीय शिबिराचा आढावा म्हणून विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आम्ही या शिबिराच्या माध्यमातून अनेक मूल्यवान गोष्टी तथा संचलन, व्याख्यान, ग्राम स्वच्छता, ग्रामीण संस्कृती, अंधश्रध्दा निर्मूलन इत्यादी बाबी शिकलो अशा बोलक्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी  व्यक्त केल्यात. या समारोपीय सत्राचे प्रास्ताविक व मनोगत कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ताराचंद कंठाळे यांनी तर बहारदार संचलन कु.जयश्री मानकर बी. ए. भाग २ यांनी केले.

 

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर उद्घाटन संपन्न

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय  द्वारा संचालित राष्ट्रीय सेवा  योजना विशेष शिबिर  उद्घाटन सोहळा दत्तक ग्राम पांढरी_घोडखिंडी येथे दिनांक ३० डिसेंबर २०१९ ला संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे तर उद्घाटक म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे उपाध्यक्ष श्री सतीश फाटक उपस्थित होते. सात दिवसीय निवासी  शिबिर ग्रामीण जीवनाशी नाळ जोडून ठेवण्याची उत्तम संधी आहे व  विद्यार्थी यायोगे सेवा, श्रम संस्कार यांचे धडे या शिबिरात निश्चित घेतील  असे प्रतिपादन श्री फाटक यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रा.विवेक देशमुख यांनी व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली म्हणजे  ही शिबिरे असतात आणि येथे स्वयंशिस्त, अनौपचारिक शिक्षण निसर्गाच्या  सान्निध्यात शिकता येते असे महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मंचावर भूगोल विभाग प्रमुख  प्रा.डॉ.कल्पना देशमुख, प्रा डॉ. हरिदास धुर्व तथा संचालक सौ.शर्मिला फाटक आणि मुख्याध्यापक श्री मुकुंद बावणे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ताराचंद कंठाळे यांनी प्रास्ताविक केले. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी खरा  तो  एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे हे गीत सादर केले. संचालन महेश सिरसाठ याने तर आभार  पवन देशमुख यांनी मानले. शेवटी राष्ट्र वंदना म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

वैराग्यमुर्ती गाडगे बाबा लोकशिक्षक :- प्रा. डॉ.हरिदास धूर्वे

दिनांक २० डिसेंबर २०१९ ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे दैवत विदर्भ केसरी संत गाडगे बाबा  यांची पुण्यतिथी संपन्न झाली. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून प्रा.अमोल राऊत तर मार्गदर्शक प्रा.डॉ.धुर्वे उपस्थित होते. संत गाडगे बाबा एक खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते असे प्रतिपादन डॉ. धूर्व यांनी केले. प्रा.राऊत म्हणाले की गाडगे महाराज यांचे विचार अक्षय असून रा. से. यो. स्वयम् सेवकांनी त्यांचे आचरण करावे. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे यांनी संचालन तर डॉ. आसुटकर यांनी आभार मानले.

वैचारिक अभिवादन प्रश्र्नोत्तरी स्पर्धा परिक्षा संपन्न :-

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बानाई, नागपूर द्वारा आयोजित केली जाणारी राज्यस्तरीय वैचारिक अभिवादन प्रश्र्नोत्तरी परिक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे आज दि.६ डिसेंबर २०१९ रोजी घेण्यात आली. या परिक्षेला प्रवेशित झालेल्या ७० विद्यार्थ्यांपैकी ४५ विद्यार्थी उपस्थित होते. बानाई नागपूर चे मा.खापर्डे साहेब व यवतमाळ येथील परिक्षेचे नियंत्रक मा.वानखेडे साहेबांनी परीक्षा केंद्राला भेट दिली.
सुरुवातीला उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे यांनी दीपप्रज्वलन  करून मार्गदर्शन केले. या वेळी महाविद्यालयातील डॉ.आसुटकर, डॉ.हरिश धुर्वे, प्रा.प्रशांत बागडे डॉ.ताराचंद कठांळे, प्रा. अमोल राऊत इ. प्राध्यापक उपस्थित होते.

एड्स जनजागृती रॅली

दिनांक 3 डिसेंबर 2019 ला कलेक्टर ऑफिस व नगर परिषद द्वारा आयोजित एड्स जनजागृती रॅली मध्ये बाबाजी  दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

डॉ. कलाम संपूर्ण देशासाठी प्रेरक -डॉ. सूर्यकार

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आज दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ ला भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रंथालय मार्फत साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विनायक दाते तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. अनंत सूर्यकार, अमोलक चंद महाविद्यालय तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे, प्रा.विजय दीक्षित, ग्रंथपाल व कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. डॉ.कलाम यांचे जीवन अत्यंत संघर्षमय होते. त्यांनी गरिबीवर मात करून यशाचे शिखर गाठून राष्ट्रपती झालेत व देशाला विज्ञानाच्या क्षेत्रात वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. विद्यार्थ्यांनी वाचनात सातत्य ठेऊन ग्रंथांशी सोबत करावी कारण वाचन माणसाला समृध्द बनविते आणि पुस्तके कधीच धोका देत नाहीत असे प्रतिपादन डॉ. सूर्यकार यांनी केले. प्रा.दीक्षित यांनी पुस्तके व ग्रंथालयाचे महत्व विशद करून अभ्यासिकेचा उपयोग जरूर करावा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. अध्यक्ष श्री विनायक दाते यांनी नियमित ग्रंथांसोबतच इ-पुस्तकांचा लाभ घ्यावा कारण भविष्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया आजच्या पेक्षाही अधिक क्रांती करणार असे प्रतिपादन केले. या प्रसंगी राहुल गायकवाड बी. कॉम. भाग तीन याला ग्रंथालय मित्र पुरस्कार २०१९ ने सन्मानित करण्यात आले.

दाते महाविद्यालयांत आरोग्य तपासणी शिबीर

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दिनांक १० ऑक्टोबर २०१९ ला राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. माधव बाग या  आयुर्वेदिक संस्थेच्या संचालिका डॉ. वांगे प्रमुख पाहुणे महोत्या. संस्थेचे उपाध्यक्ष श्री सतीश फाटक कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. शरीराशी संभाषण ही आता काळाची  गरज बनली आहे. आपण या धकाधकीच्या जीवनात वावरताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये असे प्रतिपादन श्री फाटक यांनी केले. डॉ. वांगे व डॉ. माणिक मेहरे, उपप्राचार्य यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक भुगोल विभाग प्रमुख डॉ. कल्पना देशमुख, संचालन कु. हर्षदा राऊत हिने तर आभार डॉ. हरिदास धुर्वे यांनी मानले. त्यानंतर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या.

दाते महाविद्यालयात गांधी जयंती उत्साहात

दिनांक 2 ऑक्टोबर २०१९ ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे विश्वस्त प्रा. हरिदास धुर्वे तर वक्ते म्हणून प्रा. अमोल राऊत उपस्थित होते. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केले. शांती, सत्य व अहिंसा ही मूल्यवान तत्वे जगाला बहाल केली, असे प्रतिपादन प्रा. राऊत यांनी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. धुर्वे म्हणाले की गांधी आणि त्यांचे विचार सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत देशाला मार्गदर्शन करत राहतील. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गावर चालून सत्यासाठी जीवन  मार्गक्रमण करावे. मंचावर प्रमुख उपस्थिती डॉ. आशालता आसुटकर होत्या. कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले. कु.हर्षदा राऊत हिने आभार मानले.

दाते महाविद्यालय प्लास्टिक निर्मूलन कार्यक्रमात सहभागी

नगर परिषद यवतमाळ द्वारा आयोजित प्लास्टिक निर्मूलन शपथ विधी कार्यक्रम दिनांक  1 ऑक्टोबर 2019 ला स्थानिक पोस्टल ग्राउंड येथे संपन्न झाला. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त यवतमाळ नगर परिषद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अजय गुल्हाने तर उद्घाटक नगराध्यक्ष कांचन चौधरी होत्या.या वेळी शहरातील अनेक महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक व शिक्षक सहभागी झाले होते. या वेळी विद्यार्थ्यांना प्लास्टिक वापरू नये याबद्दल शपथ देण्यात आली. तसेच शहरातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. दाते कॉलेजचे विद्यार्थी व प्राध्यापक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

बाबाजी दाते महाविद्यालयात रक्तदान शिबिर

दिनांक २४ सप्टेंबर २०१९ रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोटरी क्लब, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रसिध्द वास्तू शिल्पी श्री सतीश फाटक, उपाध्यक्ष वाणिज्य महाविद्यालय न्यास तर मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी श्री राजेश भामरे, प्रांतपाल, श्री जलालुद्दिन गिलानी, उप प्रांत पाल, श्री राजेश गढीकर, अध्यक्ष रोटरी क्लब यवतमाळ, विश्वस्त सौ. शर्मिला फाटक व उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे होते. रक्तदान म्हणजे आपल्या समाजाप्रती कृतज्ञता आहे व तरुणांनी नेहमी आपली ऊर्जा अशा प्रकारच्या विधायक कार्यात लावावी असे महत्त्वाचे प्रतिपादन प्रांतपाल श्री भामरे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजेश गढीकर व रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी अनुक्रमे रोटरी क्लब व राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका विशद केली . या शिबिरात एकूण ९८ पैकी ५४ राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

यंग इंडिया फोरम आणि रासेयो च्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

दिनांक ११ सप्टेंबर २०१९ रोजी स्वामी विवेकानंद दिग्विजय दिनाचे निमित्त साधून बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात यंग इंडिया फोरम तथा राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने Powers of Mind ह्या स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रावर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे तथा कु. शरयू शिवणकर व प्रथमेश पंडलवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी डॉ. ताराचंद कंठाळे यांनी प्रास्ताविक तर डॉ. आसुटकर यांनी आभार मानले. तत्पूर्वी स्वामी विवेकानंद, गाडगे बाबा व श्री बाबाजी दाते यांच्या प्रतिमांचे पूजन करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या स्पर्धेसाठी एकूण ४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

दाते कॉलेजचे समाजाचे देणे - मतिमंद मुलांना खाऊ वाटप

दि. २८ ऑगष्ट २०१९ ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कृतज्ञता  म्हणून,  तसेच श्री  रामेश्वर प्रकाश राउत, गटप्रमुख  यांच्या वाढदिवसा निमित्त जीवन विकास मंदिर येथे  मतिमंद मुलांना खाऊ वाटप केला. या प्रसंगी वाणिज्य विभागाचे रासेयो माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल राउत, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे, गौरव बावणे, रामेश्वर राउत, ऋतू सव्वालाखे, शुभम राउत उपस्थित होते. हा प्रसंग अत्यंत भावस्पर्शी होता व जीवनात कृतज्ञता काय असते हे सांगून गेला. या प्रसंगी प्रा.राउत व जीवन विकास मंदिरचे संचालक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

उद्बोधन वर्ग संपन्न : 26-8-2019

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजी नगर यवतमाळ येथे दिनांक 26 ऑगस्ट २०१९ ला राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्बोधन वर्ग संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ माणिक मेहरे होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भुगोल विभाग प्रमुख डॉ कल्पना देशमुख होत्या. राष्ट्रीय सेवा योजना  ही  व्यक्तिमत्व विकासाची चावी आहे. ग्रामीण व शहरी संस्कृती मधील फरक रासेयो शिकविते असे प्रतिपादन डॉ देशमुख यांनी केले. रासेयो जीवनात श्रम व कर्तव्य जबाबदारी शिकविते असे मत अध्यक्ष डॉ मेहरे व्यक्त केले. माजी कार्यक्रम अधिकारी  प्रा जोशी व प्रा राऊत यांनी NSS गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या वर्गाचे प्रास्ताविक डॉ आसुटकर, संचालन कु हर्षदा राऊत तर आभार महेश शिरसाट यांनी मानले. विशेष उपस्थितीत प्रा विवेक देशमुख, प्रा हरिदास धुर्वे विश्वस्त, वाणिज्य महाविद्यालय न्यास, तसेच डॉ रविजित गावंडे हे उपस्थित होते. शेवटी राष्ट्रवंदना म्हणून सांगता झाली.

दाते कॉलेज मध्ये परिसर स्वच्छता अभियान

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात परिसर स्वच्छता  रासेयो  युनिट कडून दिनांक 14 ऑगस्ट 2019  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला करण्यात आली. महाविद्यालयाचे मुख्य मैदान, आतील स्टेज, समोरील गवत व केरकचरा, तसेच नवीन इमारती समोरील गाजर गवत काढण्यात आले. तसेच रासेयो विद्यार्थ्यांनी मागील व या वर्षी जी झाडे लावलीत त्यांना आळे करून स्वच्छता करण्यात आली. या  मोहिमेत कार्यक्रम अधिकारी व सहकार्यक्रम अधिकारी यांचेसह एकूण 42 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.

युवा माहिती दूत कार्यशाळा

 दिनांक  २९  जुलै २०१९ रोजी स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य  महाविद्यालय, यवतमाळ येथे महाराष्ट्र  शासन पुरस्कृत युवा माहितीदूत कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा माहिती अधिकारी श्री राजेश येसन कर होते. शासनाच्या विविध योजना रासेयो स्वयंसेवकांनी गरजूंपर्यंत पोहचवून महितीदूत म्हणून काम करावे असे आवाहन केले. रासेयो स्वयंसेवक हा जबाबदार  नागरिक व नवमतदार म्हणून समाजाचे ऋण फेडण्याचे काम करेल असे मत प्रमुख पाहुणे श्री आशिष भागडकर यांनी व्यक्त केले. श्री सुरज भाकरे यांनी माहिती दूत अँप कसे डाउनलोड करावे व आपण समाजातील घटकांना कसे योजनांचा  लाभ घ्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ माणिक मेहरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन कार्यक्रम अधिकारी डॉ ताराचंद कंठाळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ आशालता आसुटकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

वृक्ष लागवड कार्यक्रम : -
दिनांक 17 जुलै 2019 ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत महाविद्यालाच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला. विदयार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्व सांगण्यात आले.
या प्रसंगी उपप्राचार्य प्रा डॉ माणिक मेहरे, प्रा विवेक देशमुख, प्रा डॉ कल्पना देशमुख, प्रा डॉ सचिन जयस्वाल, प्रा डॉ रविजित गावंडे, प्रा विनोद तलांडे, प्रा प्रशांत बागडे, कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ ताराचंद कंठाळे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा डॉ आशालता आसुटकर, तसेच रासेयोचे विद्यार्थी उपस्थित होते.

दाते महाविद्यालयात तंबाखू मुक्त अभियानांतर्गत शपथ ग्रहण सोहळा संपन्न

दिनांक 16 जुलै २०१९ ला राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत तंबाखू मुक्त अभियानांतर्गत शपथग्रहण सोहळा संपन्न झाला. शासनाच्या तंबाखू मुक्त अभियानांतर्गत भावी पिढी निरोगी व सुदृढ राहावी या उदात्त हेतूने प्रेरित होऊन संपूर्ण भारतभर हे अभियान राबविण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ माणिक मेहरे व कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ ताराचंद कंठाळे व डॉ राविजित गावंडे  यांनी विद्यार्थ्याना शपथ दिली. या वेळेस महाविद्यालयातील  प्राध्यापक वर्ग व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

पल्स पोलिओ कार्यक्रमात सहभाग

दिनांक 10 मार्च २०१९ ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील रासेयोचे विद्यार्थी वेगवेगळ्या पाच बूथवर ५-५ च्या गटाने पल्स पोलिओ अभियानात सहभागी झाले होते. लहान बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्यात विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

महिलांनी आत्मनिर्भर व्हावे - प्रभारी प्राचार्य प्रेरणा पुराणिक

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 8 मार्च २०१९ ला जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला गाडगे बाबा व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना हारार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक प्रा.सौ.प्रेरणा पुराणिक यांनी महिलांनी आत्मनिर्भर व्हावे तसेच आपल्या हक्कांसाठी सदैव तत्पर असावे असे प्रतिपादन केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. कल्पना देशमुख यांनी सांगितले की पौराणिक काळात कैकयीने राजा दशरथासोबत युद्धावर जाऊन पराक्रम गाजविला आणि नंतर मध्ययुगीन काळात स्त्री उंबरठ्याच्या आत राहिली, याचे कारण नित्य होणारे परकीय आक्रमण व अत्याचार हे होते. पुन्हा समाजसुधारकांनी स्त्री ही शिकून पुढे येण्यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. ताराचंद कंठाळे यांनी सांगितले की आज स्त्री चौफेर प्रगतीचे गौरीशंकर गाठत आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रांजली केळकर केले तर आभार प्रदर्शन मेघा शेंदरे हिने केले. रासेयो विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

रक्तदान हे एक राष्ट्रीय कार्य आहे--प्रा. डॉ. माणिक मेहरे

दिनांक 2 मार्च  २०१९ ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना  व संस्कार भारती  शाखा यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉ माणिक मेहरे, कार्यक्रम अधिकारी डॉ ताराचंद कंठाळे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ आसुटकर, प्रा तलांडे व अन्य प्राध्यापक व रासेयो विद्यार्थी हजर होते. या राष्ट्रीय कार्यात तरुणांनी सदैव सहभाग नोंदवून आपण रासेयो स्वयंसेवक आहोत याचा परिचय द्यावा असे प्रतिपादन डॉ माणिक मेहरे यांनी केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात प्रा डॉ सचिन जयस्वाल, प्रा जोशी व प्रा बागडे  सह एकूण 48 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा चमू सहभागी झाला होता. संस्कार भारतीचे अनेक पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते व त्यांनी सुद्धा रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला. क्षेत्रीय समन्वयक प्रा डॉ बाळकृष्ण सरकटे यांनी शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

वाहतूक नियम व विविध शस्त्रे यांची ओळख

दिनांक ४ जानेवारी २०१९ ला पोलीस अधिक्षक कार्यालय येथे पोलीस वर्धापन दिनानिमित्त  वाहतूक नियम व विविध शस्त्रे यांची ओळख परिचय करून देण्यात आला. आपण समाजात वावरत असताना जसे इतर गोष्टींबाबत चौकस असतो तसेच वाहतूक नियम काटेकोरपणे पाळणे हा आपला धर्मच आहे असे मानायला हरकत नाही. गाडी चालवताना आजकाल तरुण मोबाईल वापरतात हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे असे प्रतिपादन वाहतूक निरीक्षक श्री राठोड यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्येक्रमअ धिकारी डॉ. ताराचंद कंठाळे, डॉ. आसुटक, प्रा. हरिदास धुरवे, डॉ. गावंडे उपस्थित होते.

क्रांती ज्योती सावित्रबार्इं यांची जयंती

दिनांक ३ जानेवारी २०१९ ला राष्ट्रीय सेवा योजना कार्यालयात मुक्तिदिनाचे औचित्य साधून क्रांती ज्योती सावित्रबाई यांची जयंती व मतदान जनजागृती कार्यक्रम  महाविद्यालयात राबविण्यात आला. अत्याधुनिक VV PAD मशीनचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. येणाऱ्या काळात तरुणांना मतदान  नीट करण्यात यावे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे असे श्री कंठाळे यांनी सांगितले. प्रा. धूर्वें यांनी सावित्रबार्इंचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमास प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन व समारोप

यवतमाळ येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर दिनांक २१ ते २८ डिसेंबर २०१८ पर्यंत दत्तक ग्राम पांढरी घोडखिंडी येथे थाटात संपन्न झाले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष श्री विनायक दाते म्हणाले राष्ट्रीय सेवा योजना हे व्यक्तिमत्व विकासाचे व्यासपीठ आहे, तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांना येथे प्रकट करावे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे हे गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. संचलन कु.पायल किना के तर प्रास्ताविक डॉ. कंठाळे यांनी केले. राष्ट्र वंदना म्हणून उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली.
उद्याचा उज्वल नागरिक व समाजाची बांधिलकी जोपासणारे कर्तव्य दक्ष नागरिक या प्रकारच्या शिबिरातून घडतात असे प्रतिपादन यवतमाळच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष सौ.कांचनताई बाळासाहेब चौधरी शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमास केले. टेक्सास विद्यापीठ येथून डी.लिट. प्राप्त प्राध्यापक श्री हरिदास धुर्वे यांचा या प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सौ.प्रेरणा पुराणिक, श्री फाटक साहेब व श्री देशमुख यांची समयोचीत भाषणे झाली. शिबिरातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. कंठाळे यांनी तर संचालन कु प्रांजली केळकर हिने केले. उद्घाटन व समारोपाच्या दोन्ही कार्यक्रमास संस्थेचे सर्व मान्यवर, प्राध्यापक वर्ग माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी राष्ट्र वंदना गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

संत गाडगे बाबा खरे लोकशिक्षक

दिनांक २० डिसेंबर २०१८ ला स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महा .राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत संत गाडगे बाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे तर प्रमुख मार्गदर्शक श्री महेश डहाके, नंदुरकर विद्यालय हे होते. गाडगे बाबांनी  दिन  दुबळ्यांची सेवा करून आदर्श निर्माण केला. आधी श्रम व नंतर मिळेल ती माधुकरी  मागून जीवन व्यतीत करणारा लोकोत्तर महापुरुष गाडगे बाबा असे श्री डहाके म्हणाले. राष्ट्रीय सेवा योजना जगण्याचा विषय आहे, विद्यार्थ्यांनी या महापुरुषांच्या जीवन कार्यातून  काहीतरी आदर्श घ्यावा तरच पुण्यतिथी साजरी झाली समजावे असे उद्गार डॉ.माणिक मेहरे यांनी काढले. प्रास्ताविक डॉ. आसुटकर यांनी तर पाहुण्यांचा परिचय  कार्यक्रम अधिकारी डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केला. संचलन कू. खवले तर आभारप्रदर्शन प्रतीक गेडाम यांनी केले. प्रा. डॉ. वर्षा कुलकर्णी व प्रा.विनोद तलांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर स्वच्छता मोहीम  बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महा. च्या राष्ट्रीय सेवा योजना मार्फत राबविण्यात आली. संत गाडगे बाबांनी संपूर्ण जीवन स्वच्छतेच्या कामी लावले असून त्यांचा आदर्श घेऊन रा से यो विद्यार्थी यांनी मार्गक्रमण करावे  असे मनोगत प्रा.राऊत यांनी व्यक्त केले.

देशाचा प्रत्येक नागरिक सैनिक आहे

 स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महा.यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने लेफ्टनंट कमांडींग ऑफिसर श्री वैभव कासलीकर यांचे प्रेरक भाषण आयोजित करण्यात आले. या देशाचा प्रत्येक नागरिक हा सैनिक असावा असे   मत त्यांनी व्यक्त केले. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी  अनेकांनी रक्त सांडले आहे. याचे  नित्यस्मरण असू द्यावे, नाही तर इतिहास आपणास माफ करणार नाही, असे उद्गार विशाखा पट्टणं येथे कार्यरत असलेले श्री वैभव कासलिकर यांनी काढले. अध्यक्ष म्हणून प्राचार्य प्रेरणा पुराणिक तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे व श्री विजय कासलीकर् तसेच प्रा.विवेक देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.ताराचंद कंठाळे यांनी केले. डॉ. असुटकार व रा से यों विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य पुराणिक यांनी सभेला संबोधित केले. शेवटी राष्ट्र वंदना घेऊन सांगता करण्यात आली.

सरदार पटेल अखंड भारताचे शिल्पकार -डॉ. नितीन खर्चे

आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ ला स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महा. येथे सरदार वल्लभ भाई पटेल  यांची जयंती अर्थात राष्ट्रीय ऐक्य दिवस तसेच दिवंगत पंतप्रधान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. लोहपुरुष सरदार पटेल यांनी गृहमंत्री असताना अनेक देशोपयोगी निर्णय घेतलेत तसेच ५५० संस्थानिकांना भारतात विलीन  करून भारताला अखंड ठेवण्याचा  प्रण पूर्ण केला.असे प्रतिपादन प्रमुख वक्ते मा. डॉ. नितीन  खर्चे यांनी केले. त्यांनी सरदार पटेल यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. इंदिरा गांधी यांनी कठीण काळात देशाच्या हितासाठी हौतात्म्य पत्करले असे उद्गार प्रमुख पाहुणे क्षेत्रीय समन्वयक प्रा. डॉ. सरकटे  यांनी काढले. देश सरदार पटेल यांचा त्याग विसरू शकत नाही.तरुणांनी या दोन्ही देशभक्त नेत्यांच्या जीवन चरित्रातून बोध घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्ष प्राचार्य प्रेरणा पुराणिक होत्या.प्रास्ताविक सह कार्यक्रम अधिकारी  प्रा. डॉ. आशालता आसुटकर  यांनी तर संचलन कु.  गोडसे हिने केले. आभार शुभम राऊत याने केले व राष्ट्र वंदना म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे आज दिनांक १३ ऑक्टोबर २०१८ ला राष्ट्रीय सेवा योजना  विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य सौ. प्रेरणा पुराणिक कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे श्री सतीश फाटक ,प्रसिद्ध वास्तुशिल्पी  तथा उपाध्यक्ष वाणिज्य महाविद्यालय न्यास, यवतमाळ तर प्रमुख मार्गदर्शक  म्हणून प्रा. विवेक देशमुख, इंग्रजी विभाग प्रमुख तथा सदस्य, विद्वद परिषद, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे उपस्थित होते.
जीवनात वेळ काळ कुणालाच सांगून येत नसते. तेव्हा वैयक्तिक, सामाजिक वा राष्ट्रीय आपत्ती असो माणसाने नियोजन हे केलेच पाहिजे. आपत्ती हा जीवनाचा एक भागच आहे. त्यामुळे खचून न जाता जो धैर्याने आपत्तीचा सामना करतो तोच खरा रासेयो स्वयमसेवक म्हणता येईल. तामिळनाडू मधील एका राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती अंजू  जॉर्ज यांनी किती कौशल्याने प्रशासन सांभाळले व काय काय प्राथमिक जबाबदाऱ्या आपत्ती ग्रस्तांना उपलब्ध करून दिल्या या वर प्रा.विवेक देशमुख यांनी  प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. श्री सतीश फाटक यांनी मार्गदर्शनात सांगितले की राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य हे सेवा आहे. तेव्हा या देशावर जेव्हा जेव्हा राष्ट्रीय आपत्ती आली तेव्हा  तेव्हा रासेयो, एन .सी .सी. सारख्या शासनेतर संस्थांनी नेहमी सेवा प्रदान करून सामाजिक बांधीलकीचा व संवेदनेचा परिचय दिला आहे. सरकार् म्हणजे  दुसरे तिसरे कुणीच नसून आपणच आहोत हि भावना मनाशी बाळगून त्सुनामी, किल्लाराचा भूकंप, गुजरात, अलीकडील पुणे येथील घटना   व इतर अनेक संकट  वेळी  स्वयम सेवकांनी पुढाकार घेतला याचा इतिहास साक्षी आहे. असे प्रतिपादन प्राचार्य पुराणिक यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ आशालता आसुटकर यांनी तर पाहुण्यांचा परिचय व “खरा तो एकची धर्म ,जगाला प्रेम अर्पावे” हे रासेयो गीत कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे  यांनी केले. संचलन कु.धनश्री कापशीकर बी .ए .भाग २ तर आभार कु.आरती जिभकाटे हिने केले.

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस आचारसंहिता दिन

दिनांक २४/९/१८ ला राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन  साजरा करण्यात आला. अध्यक्ष स्थानी प्रा. डॉ. माणिक मेहरे तर प्रमुख अतिथी जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. कमल राठोड होते.  प्रमुख वक्ते प्रा. डॉ. कमल राठोड यांनी खालील माहिती दिली.

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना  दिन २४/९/१९६९ ला संपूर्ण भारतभर  महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी  वर्षापासून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. महाविद्यालयीन विद्यार्थी हे सेवाभावी व्हावे व त्यायोगे त्यांच्यात नेतृत्व गुणाचा विकास व्हावा या उदात्त हेतूने रासेयो ची स्थापना करण्यात आली. समाजसेवेचे काम हे ग्रामीण भागात  रासेयोचे विद्यार्थी स्वच्छता दूत म्हणून काम करतील अशी प्रांजळ अपेक्षा विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केली होती. २४/९/१९६९ ला तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ. व्ही. के. राव यांनी राष्ट्रीय सेवा योजना सुरू केल्याची घोषणा केली.

आर्मी मध्ये सेवा करणे ही सर्वोच्च देशसेवा-- कर्नल अभय पटवर्धन

दिनांक 19 सप्टेंबर २०१८ ला स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे कर्नल अभय पटवर्धन, नागपूर यांनी आर्मी मध्ये युवकांना सेवेची संधी या विषयावर उपयुक्त मार्गदर्शन केले . राष्ट्रीय सेवा योजना  मार्फत आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कर्नल अभय पटवर्धन म्हणाले की आर्मी मध्ये सेवा करण्यासाठी विद्यार्थ्यानी पुढाकार घ्यावा. आर्मी मध्ये कुशाग्र बुद्धिमत्तेची आवश्यकता नसते तर कॉमन सेन्स व लॉजिकची फार गरज असते. आर्मी मध्ये सिलेक्शन होण्यासाठी मुलाखतीची तयारी कशी करावी व प्रश्न पत्रिकेचे स्वरूप कसे असते या वर त्यांनी प्रकाश टाकला. आर्मी मध्ये  वेतन व रजेच्या उत्तम सुविधा असतात. मुली सुद्धा आर्मी मध्ये प्रवेश घेऊ शकतात. UPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मुलाखत देऊन आपण पदोन्नतीच्या कर्नल पदापर्यंत पोहचू शकतो.

"अवयव दान:युवकांची भूमिका"

 दिनांक 6/9/18 यवतमाळ - अवयव दान महा दान--डॉ. सारिका शहा
स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने द्वारा आयोजीत *अवयव दान - युवकांची भूमिका*  या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला  अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य सौ प्रेरणा पुराणिक तर अतिथी डॉ मनोज पवार,राज्यस्तरीय प्रशिक्षक तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ सारिका शहा उपस्थित होत्या .  अवयव दान केल्याने मरणोत्तर जीवन जगण्याची संधी प्राप्त होते असे डॉ शहा म्हणाल्या. प्राचार्य पुराणिक मॅडम यांनी सुद्धा यावेळी विद्यार्थ्याना  संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार्यक्रम अधिकारी डॉ आशालता आसुटकर यांनी तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ ताराचंद कंठाळे यांनी केले

राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे उदबोधन वर्ग

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने उदबोधन वर्गाचे आयोजन  दिनांक 29 सप्टेंबर २०१८ ला करण्यात आले. अध्यक्ष म्हणून प्राचार्य  प्रेरणा पुराणिक तर प्रमुख पाहुणे  म्हणून  वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे  अध्यक्ष  श्री विनायक दाते होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयचे  प्राचार्य डॉ अविनाश कोल्हटकर उपस्थित होते. मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले राष्ट्रीय सेवा योजना हे त्याग व समर्पण चे व्यासपीठ आहे. व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याची पाठशाळा राष्ट्रीय सेवा योजना आहे. अतिशय सोप्या आणि सुंदररित्या राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजवून सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ ताराचंद कंठाळे यांनी केले तसेच सुत्रसंचलन कु. नंदिनी बनकर  तर आभार कु. पायल किनाके हिने केले. डॉ माणिक मेहरे यांनी  पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली

वृक्षारोपण कार्यक्रम

राष्ट्रीय सेवा योजनेचा कौतुकास्पद उपक्रम :- दिनांक 20 जुलै २०१८ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य  महाविद्यालय  येथे राष्ट्रीय सेवा योजना मार्फत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते, सदस्या सुषमा दाते, प्रभारी प्राचार्य प्रेरणा पुराणिक, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे तसेच अनेक प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सर्व झाडे जगवण्याची व वाढविण्याची जबाबदारी प्राध्यापकानी घेतली असून प्रत्येक प्राध्यापकानी एका झाडाचे पालकत्व स्वीकारले आहे.

कु.गायत्री देवराव माने - महाविद्यालयातील बी.ए. भाग २ ची विद्यार्थिनी व राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक कु. गायत्री देवराव माने हिची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलन -२०१८ करीता निवड झालेली आहे.  महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे तिचे हार्दिक अभिनंदन.

विषबाधित शेतकऱ्यांची विचारपुस - यवतमाळ जिल्ह्यात कीटक नाशक फवारणीत अनेक शेतकरी विषबाधित झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालु आहेत. दाते कॉलेजच्या रासेयो विभागाने प्रा. डॉ. कल्पना देशमुख व प्रा. अमोल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय रुग्णालयात जाऊन विष बाधित रुग्णांची विचारपुस केली व त्यांना चादरी व फळे यांचे वाटप केले. संस्थेच्या व्यवस्थापनाने या उपक्रमाबद्दल  विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

वाचन प्रेरणादिन साजरा - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थे त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणादिन म्हणून रासेयोतर्फे साजरा करण्यात आला. प्रा. डॉ. कल्पना देशमुख यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमाचे महत्व सांगितले. काही विद्यार्थ्यानी त्यांचे विचार व्यक्त केले. आयुष्यातील एकटेपणा दूर करायचा असेल तर वाचन हा एक चांगला छंद आहे असे मत प्रमुख अतिथी सुषमा दाते यांनी व्यक्त केले. प्रमुख वक्ते श्री. विवेक कवठेकर यांनी आयुष्यात प्रेरणा मिळवण्यासाठी वाचनाचे महत्व सांगितले. संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांनी सांगितले की ज्ञान मिळविण्यासाठी अनेक साधने आहेत त्यात वाचन हे महत्वाचे साधन आहे. प्रा. अमोल राऊत यांनी आभार मानले.

स्वच्छता उपक्रम - दाते महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या प्रसंगी रासेयोच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या मैदानावरील गाजर गवत कापणे, प्लास्टिक केरकचरा याची विल्हेवाट लावणे, रोपट्यांना पाणी घालणे इत्यादी कामे मोठ्या उत्साहात पार पाडली. प्राचार्य डॉ. निस्ताने यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल राऊत सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. कल्पना देशमुख यांनी स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले.